कविता कधी अशीच सुचत नाही.....
मनाच्या कोपर्यात कविता कधी अशीच सुचत नाहीकुठे तरी मनात न बोलता सांगणार असत खुप काही.....
मनात घुटुन बसतात व्यक्त होणारे असंख्य शब्दमन हतबल होउन निपुट पणे पाहत सगळ स्तब्ध.....
फेडन्याची इच्छा असुनही न फेडताच ठेवावी लागतात देणीअनेक दुख गिळत आपण डोळ्यातलेही थेंब गिलतो मनोमनी.....
जगण्याच नाटक कराव लागत क्षणोक्षणी मरतानाजिंकत आलेल स्वप्न पाहाव लागत कधी हरताना.....
उन्हाचे चटके झेलून अनेकांसाठी झाडाची सावली व्हाव लागतसार असह्य होउन सुद्धा डोळ्यातील थेंम्बाना निमूट प्याव लागत.....
अनेक विचार मांडल्यावर मग कागदावर येतात शब्द धाऊनविचारांच्या जंगलातला वणवा न पेटताच विजतो राहून.....
हे सार सोसल्यावर मग कुठे जन्मते कविता टीच भरटीच भर असली तरी अनेकांचे गहिवरून आणते मन खर.....
वेगवेगळ्या रंगाच्या, वेगवेगळ्या अंगाच्या, काही माझ्या, काही मला आवडलेल्या कविता आणि लेख...... कदाचित तुम्हालाही आवडतील...
माझी ब्लॉग सूची
शुक्रवार, २४ डिसेंबर, २०१०
शुक्रवार, १७ डिसेंबर, २०१०
कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये,
कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये,
की आपल्याला त्याची सवय व्हावी,
तडकलेच जर ह्रुदय कधी,
जोडताना असह्य वेदना व्हावी,
डायरीत कुणाचे नाव इतकीही येऊ नये,
की पानांना ते नाव जड व्हावे,
एक दिवस अचानक त्या नावाचे,
डायरीत येणे बन्द व्हावे,
स्वप्नात कुणाला असेहि बघु नये,
की आधाराला त्याचे हात असावे,
तुटलेच जर स्वप्न अचानक,
हातात आपल्या काहिच नसावे,
कुणाला इतकाही वेळ देऊ नये,
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा,
एक दिवस आरशासमोर आपनास,
आपलाच चेहरा परका व्हावा,
कुणाची इतकीही ओढ नसावी,
की पदोपदि आपण त्याची वाट बघावी,
आणि त्याची वात बघता बघता,
आपलीच वाट दीशाहीन व्हावी,
कुणाचे इतकेही ऐकू नये,
की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा,
आपल्या ओठांतुनही मग,
त्याच्याच शब्दांचा ऊच्चार व्हावा,
कुणाची अशीही सोबत असू नये,
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी,
ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने,
डोळ्यात खळकन अश्रु जमावेत,
कुणाला इतकीही माझी म्हनू नये की,
त्याचे मीपण आपन विसरून जावे,
त्या संभ्रमात त्याने आपल्याला,
ठेच देऊन जागे करावे,
पण..................कुणाच्या इतक्याही दूर जाऊ नये,
की आपल्या सावलीशिवाय सोबत काही राहू नये!!!!!!!!!!!! !!!!!!!!! !!!!
की आपल्याला त्याची सवय व्हावी,
तडकलेच जर ह्रुदय कधी,
जोडताना असह्य वेदना व्हावी,
डायरीत कुणाचे नाव इतकीही येऊ नये,
की पानांना ते नाव जड व्हावे,
एक दिवस अचानक त्या नावाचे,
डायरीत येणे बन्द व्हावे,
स्वप्नात कुणाला असेहि बघु नये,
की आधाराला त्याचे हात असावे,
तुटलेच जर स्वप्न अचानक,
हातात आपल्या काहिच नसावे,
कुणाला इतकाही वेळ देऊ नये,
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा,
एक दिवस आरशासमोर आपनास,
आपलाच चेहरा परका व्हावा,
कुणाची इतकीही ओढ नसावी,
की पदोपदि आपण त्याची वाट बघावी,
आणि त्याची वात बघता बघता,
आपलीच वाट दीशाहीन व्हावी,
कुणाचे इतकेही ऐकू नये,
की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा,
आपल्या ओठांतुनही मग,
त्याच्याच शब्दांचा ऊच्चार व्हावा,
कुणाची अशीही सोबत असू नये,
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी,
ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने,
डोळ्यात खळकन अश्रु जमावेत,
कुणाला इतकीही माझी म्हनू नये की,
त्याचे मीपण आपन विसरून जावे,
त्या संभ्रमात त्याने आपल्याला,
ठेच देऊन जागे करावे,
पण..................कुणाच्या इतक्याही दूर जाऊ नये,
की आपल्या सावलीशिवाय सोबत काही राहू नये!!!!!!!!!!!! !!!!!!!!! !!!!
गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०१०
बधीरतेचे श्लोक
चला चांगले चांगले अन्न खाऊ
तशी सरबते थंड ग्लासात घेऊ
जळो उदबत्ती लुटू गंध त्याचा
इथे रंगू दे रंग या जिंदगीचा
उपाशी बिपाशी असो कोणी कोठे
मनाला नको जाणिवांचे धपाटे
भुकेले मरो कोणी घासून टाचा
इथे रंगू दे रंग या जिंदगीचा
कुणी मुक्त आहे, कुणी बद्ध आहे
कुठे युद्ध आहे, कुठे बुद्ध आहे
नको भार माथा कुणाचा कशाचा
इथे रंगू दे रंग या जिंदगीचा
कधी उन्ह आहे, कधी पूर आहे
मना यात काही नवे काय आहे?
असे दोष कर्माहुनी प्राक्तनाचा!
इथे रंगू दे रंग या जिंदगीचा
कुणी भ्रष्ट होते, कुणी ठार होते
अशी पेपरे रोज भारतात येथे
नको खंत रे तोच व्यवसाय त्यांचा!
इथे रंगू दे रंग या जिंदगीचा
पहा ढीग तो लष्करी भाकर्यांचा
नको रे मना छंद तो भाजण्याचा!!
जराही उडावा न टकवा स्वतःचा
इथे रंगू दे रंग या जिंदगीचा
मुखी दाढ दुखते खरी ती व्यथा रे!
व्यथा अन्य त्या सर्व केवळ कथा रे!!
निदिध्यास तो फक्त लागो स्वतःचा
इथे रंगू दे रंग या जिंदगीचा
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले
म्हणोनी तुझे घास सुग्रास झाले
न सोडी कधी कोश हा रेशमाचा!
इथे रंगू दे रंग या जिंदगीचा
तशी सरबते थंड ग्लासात घेऊ
जळो उदबत्ती लुटू गंध त्याचा
इथे रंगू दे रंग या जिंदगीचा
उपाशी बिपाशी असो कोणी कोठे
मनाला नको जाणिवांचे धपाटे
भुकेले मरो कोणी घासून टाचा
इथे रंगू दे रंग या जिंदगीचा
कुणी मुक्त आहे, कुणी बद्ध आहे
कुठे युद्ध आहे, कुठे बुद्ध आहे
नको भार माथा कुणाचा कशाचा
इथे रंगू दे रंग या जिंदगीचा
कधी उन्ह आहे, कधी पूर आहे
मना यात काही नवे काय आहे?
असे दोष कर्माहुनी प्राक्तनाचा!
इथे रंगू दे रंग या जिंदगीचा
कुणी भ्रष्ट होते, कुणी ठार होते
अशी पेपरे रोज भारतात येथे
नको खंत रे तोच व्यवसाय त्यांचा!
इथे रंगू दे रंग या जिंदगीचा
पहा ढीग तो लष्करी भाकर्यांचा
नको रे मना छंद तो भाजण्याचा!!
जराही उडावा न टकवा स्वतःचा
इथे रंगू दे रंग या जिंदगीचा
मुखी दाढ दुखते खरी ती व्यथा रे!
व्यथा अन्य त्या सर्व केवळ कथा रे!!
निदिध्यास तो फक्त लागो स्वतःचा
इथे रंगू दे रंग या जिंदगीचा
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले
म्हणोनी तुझे घास सुग्रास झाले
न सोडी कधी कोश हा रेशमाचा!
इथे रंगू दे रंग या जिंदगीचा
रविवार, २४ ऑक्टोबर, २०१०
मार्ग
चालतो मी सारखा हा
चालण्याला अंत नाही
चाललो कोठे कशाला
हीहि आता खंत नाही
एकदा पूर्वी मलाही
वेड होते शोधण्याचे
वेदनेवाचून काही
लाभ झाला त्यात नाही.
जाणत्या थोराकडेही
खूप केली चौकशी मी
शब्दजालातून कळले
अज्ञतेला पार नाही.
योजनेचा या नकाशा
ज्या ठिकाणी ठेवलेला
खंडकाने वेढलेल्या
त्या स्थळाला दार नाही.
ना कळावे हीच इच्छा
जो कुणी आहे तयाची
शोधतो त्याच्या कृपेचा
शोधका आधार नाही.
मी म्हणोनी सोडला तो
नाद आता मंझीलाचा
चालण्याचे श्रेय आहे
अन्य धर्माचार नाही।
-कुसुमाग्रज
चालण्याला अंत नाही
चाललो कोठे कशाला
हीहि आता खंत नाही
एकदा पूर्वी मलाही
वेड होते शोधण्याचे
वेदनेवाचून काही
लाभ झाला त्यात नाही.
जाणत्या थोराकडेही
खूप केली चौकशी मी
शब्दजालातून कळले
अज्ञतेला पार नाही.
योजनेचा या नकाशा
ज्या ठिकाणी ठेवलेला
खंडकाने वेढलेल्या
त्या स्थळाला दार नाही.
ना कळावे हीच इच्छा
जो कुणी आहे तयाची
शोधतो त्याच्या कृपेचा
शोधका आधार नाही.
मी म्हणोनी सोडला तो
नाद आता मंझीलाचा
चालण्याचे श्रेय आहे
अन्य धर्माचार नाही।
-कुसुमाग्रज
शनिवार, २३ ऑक्टोबर, २०१०
मर्म
असा असे कि तसा असे मी
मीच मनाला पुसतो
उतार नसलेल्या गणिताचे
घुसळत पाणी बसतो.
घनश्याम मी मीच सुधाकर
तळीरामही मीच
मीच केधवा कीचक होतो
बलशाली अन नीच.
अशी मनाच्या रंगमंचकी
बहुविध पात्रे जमती
माझे मीपण कसे नेमके
त्यातुनी यावे हाती!
इतर जनांच्या व्यक्तित्वाचे
कीर्तन पडते कानी
उदार अमके कणखर तमके
ते मोठे अभिमानी !
कातरलेला कानसलेला
स्वभाव अपुला नाही
खंत मनाला कधी कधी ही
उगाच टोचत राही.
परंतु जेव्हा मलाही मिळते
लेबल 'ऐसे तैसे '
मर्म कळे मज जनरीतीचे
सुटते कुट जरासे.
निराकारता संमत नाही
ना समजे आम्हा ती
म्हणून तिजवर लिंपित बसतो
ही रेषांची माती!
-कुसुमाग्रज
मीच मनाला पुसतो
उतार नसलेल्या गणिताचे
घुसळत पाणी बसतो.
घनश्याम मी मीच सुधाकर
तळीरामही मीच
मीच केधवा कीचक होतो
बलशाली अन नीच.
अशी मनाच्या रंगमंचकी
बहुविध पात्रे जमती
माझे मीपण कसे नेमके
त्यातुनी यावे हाती!
इतर जनांच्या व्यक्तित्वाचे
कीर्तन पडते कानी
उदार अमके कणखर तमके
ते मोठे अभिमानी !
कातरलेला कानसलेला
स्वभाव अपुला नाही
खंत मनाला कधी कधी ही
उगाच टोचत राही.
परंतु जेव्हा मलाही मिळते
लेबल 'ऐसे तैसे '
मर्म कळे मज जनरीतीचे
सुटते कुट जरासे.
निराकारता संमत नाही
ना समजे आम्हा ती
म्हणून तिजवर लिंपित बसतो
ही रेषांची माती!
-कुसुमाग्रज
पंतप्रधान
इंद्राघरचे पिउनि रसायन प्रधान आमुचे आले.
अलकेतील चीर यौवन येथे रूप काश्मिरी ल्याले.
चरण धरेवर शीर मेघावर कसरत कौतुकशाली
नक्षत्रांशी वरती चर्चा पद ठेचाळत खाली.
मुलात काका जगात स्नेही गुरुजी भारत देशी
छडी परजती कधी प्रजेवर मग्न कधी उपदेशी.
उडया घालती सभासागरी-पोलिसखाते तंग-
नाच जंगली जनात करती मुक्त खेळती रंग.
गतीत रमती, देशोदेशी फिरते नित्य विमान
निर्यातीच्या गटात यांचा केवळ पहिला मान.
सुत कातती पुकारती पण अणूयुगाची द्वाही
जनशाही स्थिर करण्यासाठी वरती नायकशाही.
थोडे पंडीत थोडे इंग्रज थोडी मोगल शान
कवी मीमांसक समाजवादी गांधीचा अभिमान
दावा पहाडी-कस्तुरी केशर परवानग सोमल काही
स्पतीकाचा घट, असे विलाखन मिश्रण नाही.
ताईत कुठला गळ्यात आहे कुणास ना हे कळले
मते घेउनी त्यांच्यामागे धावती पण मतवाले.
विशाल नयनी परंतु केव्हा पहा वेदना साचे
शब्दावाचुनी त्यात उकळते मानस मानवतेचे.
अतर्क्यतेतही एकाच निश्चित -आज वादळी रात
गहन तमी हा एकच जळतो नंदादीप जगात.
अलकेतील चीर यौवन येथे रूप काश्मिरी ल्याले.
चरण धरेवर शीर मेघावर कसरत कौतुकशाली
नक्षत्रांशी वरती चर्चा पद ठेचाळत खाली.
मुलात काका जगात स्नेही गुरुजी भारत देशी
छडी परजती कधी प्रजेवर मग्न कधी उपदेशी.
उडया घालती सभासागरी-पोलिसखाते तंग-
नाच जंगली जनात करती मुक्त खेळती रंग.
गतीत रमती, देशोदेशी फिरते नित्य विमान
निर्यातीच्या गटात यांचा केवळ पहिला मान.
सुत कातती पुकारती पण अणूयुगाची द्वाही
जनशाही स्थिर करण्यासाठी वरती नायकशाही.
थोडे पंडीत थोडे इंग्रज थोडी मोगल शान
कवी मीमांसक समाजवादी गांधीचा अभिमान
दावा पहाडी-कस्तुरी केशर परवानग सोमल काही
स्पतीकाचा घट, असे विलाखन मिश्रण नाही.
ताईत कुठला गळ्यात आहे कुणास ना हे कळले
मते घेउनी त्यांच्यामागे धावती पण मतवाले.
विशाल नयनी परंतु केव्हा पहा वेदना साचे
शब्दावाचुनी त्यात उकळते मानस मानवतेचे.
अतर्क्यतेतही एकाच निश्चित -आज वादळी रात
गहन तमी हा एकच जळतो नंदादीप जगात.
शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०१०
मनात माझ्या-
मनात माझ्या भलते नाही विचार जा त्या वार्याला
मेघाआडुनी लुकलुक नार्या चुघलखोर त्या तार्याला.
सौधावर मी उभी राहते
अस्तकालचे नवल पाहते
कुणी खुणावत खाली येते
क्षणात वळते मी माघारी दडते आत निवार्याला.
कधी नदीवर भरता पाणी
पैलतटावर गाते कोणी
अर्धा मूर्धा घडा भरोनी
तशीच येते घाटावर मी चारजणींच्या थार्याला.
आत्ममग्न मी कधी एकांती
नगर शिवेवर मार्गावारती
धुळीत कुसुमे अवचित पड़ती
स्पर्श न करते कधीही मी त्या गंधित मृदुल निखार्याला.
गवाक्षातुनी पहाटकाली
बघता, हलती दूर मशाली
मालवुनी मी दिवे महाली
कालोखाचे उत्तर देते त्या खात्धीत इशार्याला .
हे मतवाले स्वैरप्रवासी
लौकिक नीति नसे अशासी
भोग घडीचा मग सन्यासी
कुलवंताची कोण अशी या भुलेल चंचल पार्याला!
मेघाआडुनी लुकलुक नार्या चुघलखोर त्या तार्याला.
सौधावर मी उभी राहते
अस्तकालचे नवल पाहते
कुणी खुणावत खाली येते
क्षणात वळते मी माघारी दडते आत निवार्याला.
कधी नदीवर भरता पाणी
पैलतटावर गाते कोणी
अर्धा मूर्धा घडा भरोनी
तशीच येते घाटावर मी चारजणींच्या थार्याला.
आत्ममग्न मी कधी एकांती
नगर शिवेवर मार्गावारती
धुळीत कुसुमे अवचित पड़ती
स्पर्श न करते कधीही मी त्या गंधित मृदुल निखार्याला.
गवाक्षातुनी पहाटकाली
बघता, हलती दूर मशाली
मालवुनी मी दिवे महाली
कालोखाचे उत्तर देते त्या खात्धीत इशार्याला .
हे मतवाले स्वैरप्रवासी
लौकिक नीति नसे अशासी
भोग घडीचा मग सन्यासी
कुलवंताची कोण अशी या भुलेल चंचल पार्याला!
खुळे
अशी माणसे खुळीबावळी जाती बाजारात
कमी आणती जिन्नस पैसा जास्त सदा देतात.
असो नसो गाडीला गर्दी जागा नसते यास
उभ्या उभ्याने प्रवास करती त्रास नको कोणास.
घड्याळ असते जवळ परी ते किल्लीवाचून बंद
विलंब करिती सर्व ठिकाणी चाल मुळातच मंद.
हारावती सदऱ्याच्या गुंड्या, बूट सापडे एक
मुदत बार झाल्यावर जाती वटवायाला चेक.
कागद हरवे कचेरीत, ते मेजाखाली शिरती,
धांदलीत त्या पैसे पडती, दौत सांडते वरती.
पडती झडती अडखळती हे पराभूत व्यवहारी
वावरती या जगात परंतु अन्य जगात पथारी.
परी केधवा अघटीत घडते, काहि पणाला लागे
अशा बावळ्यामधून होती ज्वालांचे गिरी जागे.
अशा खुळ्याच्या जामावातुनी महाखुळे ते येती
जनावरातुनी माणसास जे पुढे जरासे नेती.
महाखुळे ते होते, असती, म्हणून आपण सारे
रुपयांसह पेटीत ठेवतो दोनचार हे तारे.
कमी आणती जिन्नस पैसा जास्त सदा देतात.
असो नसो गाडीला गर्दी जागा नसते यास
उभ्या उभ्याने प्रवास करती त्रास नको कोणास.
घड्याळ असते जवळ परी ते किल्लीवाचून बंद
विलंब करिती सर्व ठिकाणी चाल मुळातच मंद.
हारावती सदऱ्याच्या गुंड्या, बूट सापडे एक
मुदत बार झाल्यावर जाती वटवायाला चेक.
कागद हरवे कचेरीत, ते मेजाखाली शिरती,
धांदलीत त्या पैसे पडती, दौत सांडते वरती.
पडती झडती अडखळती हे पराभूत व्यवहारी
वावरती या जगात परंतु अन्य जगात पथारी.
परी केधवा अघटीत घडते, काहि पणाला लागे
अशा बावळ्यामधून होती ज्वालांचे गिरी जागे.
अशा खुळ्याच्या जामावातुनी महाखुळे ते येती
जनावरातुनी माणसास जे पुढे जरासे नेती.
महाखुळे ते होते, असती, म्हणून आपण सारे
रुपयांसह पेटीत ठेवतो दोनचार हे तारे.
शनिवार, १६ ऑक्टोबर, २०१०
आनंदाची फुलबाग
ही बाग रसिक हो! आनंदाची फुलली,
जा फिरा, लुटा रस, इच्छा जरि मनि असली.
कित्येक सन्मती मधुर गंध सेवोनी
आनंदे डुलती, भूलति भान हरपोनी.
ज्या बाग बोललो परी मानवी नाच ती;
मग तिथे कोठली रम्य, नेटकी रीति?
ईश्वरी कृपेची लीला जी चौफेर,
हे तिचेच दर्शन एक आत बाहेर.
वनसृष्टीमंदिरी कुठली नीटस शोभा ?
त्या ताजमहाली सौंदर्याचा गाभा.
मृदू जातीसन्नीध शिला कठीण हृदयाची,
ठाउकेच सकलां, ऐशी रचना वनिंची.
लेखितो रसिक कुणी नीरस त्या विपिनाला,
परी तिथेच दिसते खरी हरीची लीला.
निर्वेध मनाने करुनी आंत प्रवेश,
सच्छील लोचने पहा गीत्वान देश.
कुणी प्रवेशद्वारी वानितील. हंसतील:
व्हा बधिर, अंध तई वृति ठेवुनी अचल.
मन रामो, न अथवा: तरि न दोष कवणाला;
रुची भिन्न जगाची ठावे आनंदाला.
जा फिरा, लुटा रस, इच्छा जरि मनि असली.
कित्येक सन्मती मधुर गंध सेवोनी
आनंदे डुलती, भूलति भान हरपोनी.
ज्या बाग बोललो परी मानवी नाच ती;
मग तिथे कोठली रम्य, नेटकी रीति?
ईश्वरी कृपेची लीला जी चौफेर,
हे तिचेच दर्शन एक आत बाहेर.
वनसृष्टीमंदिरी कुठली नीटस शोभा ?
त्या ताजमहाली सौंदर्याचा गाभा.
मृदू जातीसन्नीध शिला कठीण हृदयाची,
ठाउकेच सकलां, ऐशी रचना वनिंची.
लेखितो रसिक कुणी नीरस त्या विपिनाला,
परी तिथेच दिसते खरी हरीची लीला.
निर्वेध मनाने करुनी आंत प्रवेश,
सच्छील लोचने पहा गीत्वान देश.
कुणी प्रवेशद्वारी वानितील. हंसतील:
व्हा बधिर, अंध तई वृति ठेवुनी अचल.
मन रामो, न अथवा: तरि न दोष कवणाला;
रुची भिन्न जगाची ठावे आनंदाला.
शुक्रवार, १ ऑक्टोबर, २०१०
आस
वैभवे सारी जरी ही पास होती;
काळजाला फक्त त्याची आस होती!
जीव माझा घेउनी तो दूर गेला;
जिंदगी बाकी इथे वनवास होती!
एकदा रागात त्याला बोललो बस...
कोणती मग दुशामानी माझ्यास होती!
वादळाने घेरलेल्या झोपडीची;
वेदना कळली कुठे वार्यास होती!
जीवनाला रूप आले वाळवंटी;
जीदागानी कोरडा मधुमास होती!
-शेख गणी
काळजाला फक्त त्याची आस होती!
जीव माझा घेउनी तो दूर गेला;
जिंदगी बाकी इथे वनवास होती!
एकदा रागात त्याला बोललो बस...
कोणती मग दुशामानी माझ्यास होती!
वादळाने घेरलेल्या झोपडीची;
वेदना कळली कुठे वार्यास होती!
जीवनाला रूप आले वाळवंटी;
जीदागानी कोरडा मधुमास होती!
-शेख गणी
शनिवार, २५ सप्टेंबर, २०१०
आज मी आयुष्य माझे
आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो
नेमके ते हरवले, जे मी जपाया लागलो
त्रस्त या जीन्यास झाला स्पर्श ओझरता तिचा
अन नको म्हटले तरीही मी जगाया लागलो
गीत माझ्या लेखणीचे एवढे भिनले तिला
ती लिहाया बैसली अन मी सुचाया लागलो!
ठरवले हे पाहिजे ! ते पाहिजे ! ते हि हवे !
मागण्या ताज्यातवान्या... मी थकाया लागलो!
शोधले माझेच पत्ते आत माझ्या मी किती!
हरवलो तेव्हाच कोठे सापडाय लागलो!
मज न आता थोडकी आशा कुणी कि 'वा!'
म्हणा आज मी माझ्याचसाठी गुण गुणाया लागलो!
काय हे आयुष्य माझे !काय हि थट्टा तरी!
मी तिला सोडून सर्वा आवडाया लागलो!!
संदीप खरे.
शुक्रवार, २० ऑगस्ट, २०१०
आठवण
सांज सकाळी प्रत्येक काळी
मला तुझी आठवण येते.
ती आठवण एक साठवण
बनून मनात विरून जाते.
तुझ्या येण्याची आस, स्वप्नांचा भास
वाट तुझी पहावीशी वाटते
मोगर्याचा सुगंध, आठवणीतला गंध
अजुनही मन प्रसन्न होते
शोधुनी दिशा दाही दिसत नाही काही
मग मात्र दुःख होते.
आशा काळी संस्मरणीय वेळी
ही कविताच माझी साथ देते.
मला तुझी आठवण येते.
ती आठवण एक साठवण
बनून मनात विरून जाते.
तुझ्या येण्याची आस, स्वप्नांचा भास
वाट तुझी पहावीशी वाटते
मोगर्याचा सुगंध, आठवणीतला गंध
अजुनही मन प्रसन्न होते
शोधुनी दिशा दाही दिसत नाही काही
मग मात्र दुःख होते.
आशा काळी संस्मरणीय वेळी
ही कविताच माझी साथ देते.
श्रावण
हिरव्यागार नक्षीने नटलेली अवनी... गवताची हिरवी हिरवी पाती... त्या पात्यावरुन परावर्तित होणारी सूर्यकिरणे... आकाशात झेपावणार्या शुभ्र बगळ्याच्या माळा... भिरभिरणारी फुलपाखरे... आणि क्षणात कोसळणारा क्षणात नाहीसा होणारा ऊन पावसाचा खेळ... श्रावणातील हे हळवे वातावरण आसमंतात दरवलून राहते.
अगदी लहानपणापासूनच आपण श्रावण अनुभवत आलो आहे. मात्र बालकवींच्या
" श्रावंमासी हर्ष मानसी हिरवल डेट चोहिकडे
क्षणात येते सरसर शिडवेक्षणात फिरुनी ऊन पडे..."
या कवितेतील श्रावण वेगलीच अनुभूती देवून जातो. अनेकदा आपल्याकडे एखादी वस्तू असून सुध्दा गुणधर्मापासून दुरावले गेले असतो, किव्वा त्या वस्तुची अनुभूती मिळालेली नसते.बालकवीनी सृष्टीसौंदर्याची खाण आपल्या कवितेत आणली आहे.
मन पटकन हिरव्या गवतात... पिवळ्या सोनेरी उन्हात... गवताच्या पात्यात... सप्तरंगी इंद्रधनूत गुरफटून जाते.
निसर्ग सौंदर्याचा कलाविष्कार म्हणजे श्रावण महिना. हा महीना जसा सोवळ्या ओवळ्याचा तसा निसर्गाशी एकरूप होण्याचा! आरती प्रभुनी एक कवितेत
" लव लव करी पात डोळ नाही थार्याला
एक टक पाहू कस लुक लुक तार्याला "
अस साध सूटसुटीत वर्णन केलेल आहे. पण या कवितेची खोली खुप आहे. गवताच हिरव पात त्या पानावरून परावर्तीत होणारे सूर्यकिरण इतके तेजस्वी दिसतात की त्याकडे एकटक पाहता येत नाही हा साधासुधा अर्थ! पण, लवलवणार पात फ़क्त गवताच नसत, डोळ्यांच पातही लवलवतच असत. आपल्यात रमणारी आणि आपलस करू पाहणारी व्यक्ती आपल्याकडे पाहते.
आपली नि त्या व्यक्तीची नजर भेट होते. काही क्षण डोळ्याना डोळा भिडतो. आणि मग पापण्यांची फडफड सुरु होते. त्या व्यक्तीची मनातली सारी ओढ, उत्सुकता अणि संभ्रम निर्माण होतो. अणि त्या व्यक्तीकडे एकटक पहावास वाटत नाही. खुप काही घडत पण घडतच नाही. खुप सांगीतल जात, सुचवल जात, पण सुचवायचही राहून जात... असा हां मोरपंखी अनुभव! श्रावणात सगली सृष्टी खुलते अणि मनाला भावून जाते.
अगदी लहानपणापासूनच आपण श्रावण अनुभवत आलो आहे. मात्र बालकवींच्या
" श्रावंमासी हर्ष मानसी हिरवल डेट चोहिकडे
क्षणात येते सरसर शिडवेक्षणात फिरुनी ऊन पडे..."
या कवितेतील श्रावण वेगलीच अनुभूती देवून जातो. अनेकदा आपल्याकडे एखादी वस्तू असून सुध्दा गुणधर्मापासून दुरावले गेले असतो, किव्वा त्या वस्तुची अनुभूती मिळालेली नसते.बालकवीनी सृष्टीसौंदर्याची खाण आपल्या कवितेत आणली आहे.
मन पटकन हिरव्या गवतात... पिवळ्या सोनेरी उन्हात... गवताच्या पात्यात... सप्तरंगी इंद्रधनूत गुरफटून जाते.
निसर्ग सौंदर्याचा कलाविष्कार म्हणजे श्रावण महिना. हा महीना जसा सोवळ्या ओवळ्याचा तसा निसर्गाशी एकरूप होण्याचा! आरती प्रभुनी एक कवितेत
" लव लव करी पात डोळ नाही थार्याला
एक टक पाहू कस लुक लुक तार्याला "
अस साध सूटसुटीत वर्णन केलेल आहे. पण या कवितेची खोली खुप आहे. गवताच हिरव पात त्या पानावरून परावर्तीत होणारे सूर्यकिरण इतके तेजस्वी दिसतात की त्याकडे एकटक पाहता येत नाही हा साधासुधा अर्थ! पण, लवलवणार पात फ़क्त गवताच नसत, डोळ्यांच पातही लवलवतच असत. आपल्यात रमणारी आणि आपलस करू पाहणारी व्यक्ती आपल्याकडे पाहते.
आपली नि त्या व्यक्तीची नजर भेट होते. काही क्षण डोळ्याना डोळा भिडतो. आणि मग पापण्यांची फडफड सुरु होते. त्या व्यक्तीची मनातली सारी ओढ, उत्सुकता अणि संभ्रम निर्माण होतो. अणि त्या व्यक्तीकडे एकटक पहावास वाटत नाही. खुप काही घडत पण घडतच नाही. खुप सांगीतल जात, सुचवल जात, पण सुचवायचही राहून जात... असा हां मोरपंखी अनुभव! श्रावणात सगली सृष्टी खुलते अणि मनाला भावून जाते.
बुधवार, २१ जुलै, २०१०
पाऊस आलाय….भिजून घ्या...
पाऊस आलाय….भिजून घ्या
थोडा मातीचा गंध घ्या
थोडा मोराचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या
बघा समुद्र उसळतोय
वारा ढगांना घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या
ऑफ़ीस रोजच गाठत असतं
काम नेहमीच साठत असतं
मनातून भिजावंसं वाटत असतं
मनाची हौस पुरवून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या
सर्दी पडसे रोजचेच..
त्याला औषध तेच तेच..
प्यायचेच आहेत नंतर काढे ,
आधी अमृत पिऊन घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या
बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या
थोडा मातीचा गंध घ्या
थोडा मोराचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या
बघा समुद्र उसळतोय
वारा ढगांना घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या
ऑफ़ीस रोजच गाठत असतं
काम नेहमीच साठत असतं
मनातून भिजावंसं वाटत असतं
मनाची हौस पुरवून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या
सर्दी पडसे रोजचेच..
त्याला औषध तेच तेच..
प्यायचेच आहेत नंतर काढे ,
आधी अमृत पिऊन घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या
बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या
शनिवार, १० जुलै, २०१०
शिवण
तशी आपली सगळी गाणी आपली समजत असतो आपण
एखादेचसे गाने त्यातले आतली शिवण उसवत जाते...
असेल गाणे बरेचदा रडता रडता ओठी येते
साधारणतः असल्या वेळी आपले कोणी जवळ नसते..
आपले असे असतेच कोण? एकदोन मिठया नि चार दोन थेंब?
असेल गाणे असल्या वेळी असलेच काही सांगत असते...
रस्त्यावरून वाहणार्यानच्या नजरा जेवढ्या ओळखी देतात
पुतल्यांच्या समोर किंवा काही जसे उभे असतात...
तसेच बघणे बघत बघत गर्दी होते आरपार
एकलेपणाच्या जाणिवेला आणखीन थोड़ी चढते धार...
तसे दुकटे असतेच कोण? सगळेच असतात आपले आपले
' आपले आपले' म्हटले तरी आपण कुठे असतो आपले?
असली ओळ एरवी कधी हातून लिहिली जात नाही
आपण सुध्हा गर्दीमध्ये सहसा मरवा गात नाही !
वेळेचीच ही गोष्ट आहे, असल्या वेळी वाटते लिहावे
कवितांची आवड वेगळी... आणिक कविता करणे वेगळे !!!
कवितादेखील असते कोण? वालुत मागे उरले पाय...
'असे कधी चाललो होतो'- याच्याशिवाय उरते काय?
तरीसुद्धा कधीतरी शिवण उसवत जाते खरी
एकदा शिवण सुटली म्हणजे आत काय न बाहेर काय !
एवढेच होण्यासाठी तरी असेल गाणे मनात गावे
असले काही गुणगुणले की एकले काय नि दुकले काय...
एखादेचसे गाने त्यातले आतली शिवण उसवत जाते...
असेल गाणे बरेचदा रडता रडता ओठी येते
साधारणतः असल्या वेळी आपले कोणी जवळ नसते..
आपले असे असतेच कोण? एकदोन मिठया नि चार दोन थेंब?
असेल गाणे असल्या वेळी असलेच काही सांगत असते...
रस्त्यावरून वाहणार्यानच्या नजरा जेवढ्या ओळखी देतात
पुतल्यांच्या समोर किंवा काही जसे उभे असतात...
तसेच बघणे बघत बघत गर्दी होते आरपार
एकलेपणाच्या जाणिवेला आणखीन थोड़ी चढते धार...
तसे दुकटे असतेच कोण? सगळेच असतात आपले आपले
' आपले आपले' म्हटले तरी आपण कुठे असतो आपले?
असली ओळ एरवी कधी हातून लिहिली जात नाही
आपण सुध्हा गर्दीमध्ये सहसा मरवा गात नाही !
वेळेचीच ही गोष्ट आहे, असल्या वेळी वाटते लिहावे
कवितांची आवड वेगळी... आणिक कविता करणे वेगळे !!!
कवितादेखील असते कोण? वालुत मागे उरले पाय...
'असे कधी चाललो होतो'- याच्याशिवाय उरते काय?
तरीसुद्धा कधीतरी शिवण उसवत जाते खरी
एकदा शिवण सुटली म्हणजे आत काय न बाहेर काय !
एवढेच होण्यासाठी तरी असेल गाणे मनात गावे
असले काही गुणगुणले की एकले काय नि दुकले काय...
रविवार, २० जून, २०१०
पाऊस बहुरूपी
पाऊस मुंबईचा
जेव्हा लागतो पडायला
इथल्या माणसासारखाच त्याला
वेळ नसतो 'थाम्बायाला'!
पाऊस दिल्लीचा
"भाषण" ऐकून झालाय 'ठग'
आणतो अवसान ' महापुराच'
नि जमतात नुसतेच 'ढग'!
पाऊस काश्मीरचा
'बर्फ' होउन' थिजला
इथल्या दहशातिला
तो बापडाही भ्याला!
बंगलूरच्या पावसाचा
निरालाच 'ट्रेंड'
पाचच दिवस पडीन, म्हणतो
'आय डोंट वर्क ऑन वीकेंड'!!
पाऊस पुण्याचा
भलताच 'चेष्टेखोर'
'ती' ला भेटायला पडाव बाहेर
तर धरतो लगेच जोर !
पाऊस पंढरीचा
पडतो 'अभंग'
जसे विठ्ठलाच्या कीर्तनी
वारकरी दंग!
असा पाऊस 'बहुरूपी'
वाटे सर्वाना आपला
हां जिथे जिथे पडतो
होउन जातो तिथला!
जेव्हा लागतो पडायला
इथल्या माणसासारखाच त्याला
वेळ नसतो 'थाम्बायाला'!
पाऊस दिल्लीचा
"भाषण" ऐकून झालाय 'ठग'
आणतो अवसान ' महापुराच'
नि जमतात नुसतेच 'ढग'!
पाऊस काश्मीरचा
'बर्फ' होउन' थिजला
इथल्या दहशातिला
तो बापडाही भ्याला!
बंगलूरच्या पावसाचा
निरालाच 'ट्रेंड'
पाचच दिवस पडीन, म्हणतो
'आय डोंट वर्क ऑन वीकेंड'!!
पाऊस पुण्याचा
भलताच 'चेष्टेखोर'
'ती' ला भेटायला पडाव बाहेर
तर धरतो लगेच जोर !
पाऊस पंढरीचा
पडतो 'अभंग'
जसे विठ्ठलाच्या कीर्तनी
वारकरी दंग!
असा पाऊस 'बहुरूपी'
वाटे सर्वाना आपला
हां जिथे जिथे पडतो
होउन जातो तिथला!
सोमवार, ७ जून, २०१०
विजयोत्सवाबरोबरच.......
"स्वतंत्र होताना भारत दुभंगला, म्हणून नाराज होऊ नका. आज तीन चतुर्थांश भारत स्वतंत्र झाला म्हणून पंधरा ऑगस्टला जरूर विजयोत्सव करा. आज तर तुमच्या हातात हजार वर्षात कधी नव्हता, एवढा विस्तीर्ण प्रदेश झाला आहे. उरलेल्या एक चतुर्थांश भागाला आपण का म्हणून भ्यावे? जमेच्या बाजूला स्वातंत्र्य प्राप्तीचा बंदा रुपया आहे. मग दोष-उणिवांची चिल्लर खर्चाच्या बाजूला किती का असेना! आम्ही एक वेळ अर्धी भाकरी खाऊन त्राण जगवू. पण मिळालेले स्वातंत्र्य कधीही गमावणार नाही. स्वातंत्र्य आले म्हणून एकदम सुधारणा होणार नाही, कोणत्याही पक्षाला ती आणता येणार नाही. आपण परकीयाविरुध्द जी साधने वापरली. त्यांची आता आवश्यकता उरली नाही. मतभेद झाले तरी ते मतदानाच्या पेटीतूनच सोडवले पाहिजेत."
स्वा. सावरकर
स्वा. सावरकर
सोमवार, १० मे, २०१०
श्वास घेतला सहज…
माझ्या ओंजळीत शब्द…
काही सांडले त्यातले,
त्यांना वेचून घेताना…
रंग भावनांना आले !
आसवात नाहताना…
किती भिजली अक्षरं,
कुठे जाई जुई कळ्या…
कधी कातळ पत्थर !
कवितेच्या जन्मासाठी…
किती कळा या सोसल्या,
किरणात शितलता…
आणि प्रखर सावल्या !
नको येऊ म्हणताना…
सत्य कल्पनेत आलं,
श्वास घेतला सहज…
झाली कवितेची ओळ !
काही सांडले त्यातले,
त्यांना वेचून घेताना…
रंग भावनांना आले !
आसवात नाहताना…
किती भिजली अक्षरं,
कुठे जाई जुई कळ्या…
कधी कातळ पत्थर !
कवितेच्या जन्मासाठी…
किती कळा या सोसल्या,
किरणात शितलता…
आणि प्रखर सावल्या !
नको येऊ म्हणताना…
सत्य कल्पनेत आलं,
श्वास घेतला सहज…
झाली कवितेची ओळ !
जीव माझा एकला..
गगनात उडतोय
सा~या पक्ष्यांचा थवा
धरतीवर फिरे
जीव माझा एकला..
आत्मभान हरपले
जीव असा वेडावला
आंगणात मनाच्या
पडतो विचारांचा सडा..
कोणी कोणी ना जवळ
कोणी नाही रे असा
मनी होते हळहळ
समजावू कशी कुणाला..
सारी दूर गेली नाती
सोडून एकले ह्या जीवा
होईल कधी सांजवेळ
परतेल कधी पक्ष्यांचा थवा..
साथ आता केवळ मनाची
मनी आस धरायाची
होईल कधी सुटका जीवाची
घटका केवळ मोजायाची…
सा~या पक्ष्यांचा थवा
धरतीवर फिरे
जीव माझा एकला..
आत्मभान हरपले
जीव असा वेडावला
आंगणात मनाच्या
पडतो विचारांचा सडा..
कोणी कोणी ना जवळ
कोणी नाही रे असा
मनी होते हळहळ
समजावू कशी कुणाला..
सारी दूर गेली नाती
सोडून एकले ह्या जीवा
होईल कधी सांजवेळ
परतेल कधी पक्ष्यांचा थवा..
साथ आता केवळ मनाची
मनी आस धरायाची
होईल कधी सुटका जीवाची
घटका केवळ मोजायाची…
शब्दांची फुलपाखरे
मनातील शब्दांची फुलपाखरे हळूच कागदावर उतरली …
आणि बघता बघता एक कविता जन्मास आली !
कविता जणू वाटत होती एखाद्या तान्ह्या बाळासारखी !
नुकतीच या अनोळखी जगात पाऊल ठेवलेली,
आपल्या अस्तित्त्वाचा शोध घेणारी …
मग वाटू लागली ती एखाद्या नववधू सारखी ,
थोडीशी बावरलेली, थोडीशी संकोचलेली…
आपण लोकांना आवडू की नाही या विचारात रमलेली !
कधी कविता वाटते जवळच्या मैत्रिणी सारखी,
आपल्या सुखात व दुःखात सहभागी होणारी …
आपल्या भावना समजून घेणारी !
शेवटी प्रत्येक कवितेला असतं एक स्वतःचं व्यक्तिमत्त्व,
ती ही शोधत असते सगळ्यांमध्ये आपलं वेगळं अस्तित्त्व !
- श्वेता
आणि बघता बघता एक कविता जन्मास आली !
कविता जणू वाटत होती एखाद्या तान्ह्या बाळासारखी !
नुकतीच या अनोळखी जगात पाऊल ठेवलेली,
आपल्या अस्तित्त्वाचा शोध घेणारी …
मग वाटू लागली ती एखाद्या नववधू सारखी ,
थोडीशी बावरलेली, थोडीशी संकोचलेली…
आपण लोकांना आवडू की नाही या विचारात रमलेली !
कधी कविता वाटते जवळच्या मैत्रिणी सारखी,
आपल्या सुखात व दुःखात सहभागी होणारी …
आपल्या भावना समजून घेणारी !
शेवटी प्रत्येक कवितेला असतं एक स्वतःचं व्यक्तिमत्त्व,
ती ही शोधत असते सगळ्यांमध्ये आपलं वेगळं अस्तित्त्व !
- श्वेता
बुधवार, १४ एप्रिल, २०१०
आताच अमृताची बरसून रात गेली...
आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अंग माझे विझवून रात गेली
मजलाच हाय माझे जपता न भान आले
मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली
उरले जरा जरासे गगनात मंद तारे
हलकेच कूस माझी बदलून रात गेली
अजूनी सुगंध येई दुलईस मोगर्याचा
गजरा कसा फुलांचा विसरुन रात गेली
आताच अंग माझे विझवून रात गेली
मजलाच हाय माझे जपता न भान आले
मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली
उरले जरा जरासे गगनात मंद तारे
हलकेच कूस माझी बदलून रात गेली
अजूनी सुगंध येई दुलईस मोगर्याचा
गजरा कसा फुलांचा विसरुन रात गेली
गुरुवार, १ एप्रिल, २०१०
परीक्षा येताच वाटते...
परीक्षा येताच वाटते...
आपली नौका वादलापुढे आहे,
कसातरी अभ्यास करून
तिला डूबण्यापासुन वाचवायचे आहे.
परीक्षा येताच वाटते...
अभिमन्यु चक्रात फसतो आहे,
काही वाचुनी पुस्तके
त्यातून बाहेर निघायचे आहे.
परीक्षा येताच वाटते...
आयुष्यात मोठे संकट आलेले आहे.
प्राण पणाला लावून
त्याला दूर सरायचे आहे.
परीक्षा येताच वाटते...
तिसरे महायुद्ध सुरु आहे,
अभ्यासाला बनवुनी तलवार
या युद्धाला जिंकायचे आहे.
परीक्षा येताच वाटते...
नविन प्रकाश्ज्योत दिसणार आहे,
परीक्षेचा लागताच निकाल
पुढच्या वर्गात बसायला मिळणार आहे.
आपली नौका वादलापुढे आहे,
कसातरी अभ्यास करून
तिला डूबण्यापासुन वाचवायचे आहे.
परीक्षा येताच वाटते...
अभिमन्यु चक्रात फसतो आहे,
काही वाचुनी पुस्तके
त्यातून बाहेर निघायचे आहे.
परीक्षा येताच वाटते...
आयुष्यात मोठे संकट आलेले आहे.
प्राण पणाला लावून
त्याला दूर सरायचे आहे.
परीक्षा येताच वाटते...
तिसरे महायुद्ध सुरु आहे,
अभ्यासाला बनवुनी तलवार
या युद्धाला जिंकायचे आहे.
परीक्षा येताच वाटते...
नविन प्रकाश्ज्योत दिसणार आहे,
परीक्षेचा लागताच निकाल
पुढच्या वर्गात बसायला मिळणार आहे.
शनिवार, २७ मार्च, २०१०
बघ माझी आठवण येते का?
मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?
हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी
इवलसं तळं पिऊन टाक
बघ माझी आठवण येते का?
वार्याने उडणारे पावसाचे थेंब चेहर्यावर घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो
नाहिच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये
तो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभी रहा
वाळू सरकेल पायाखाली, बघ माझी आठवण येते का?
मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे
चालत रहा पाऊस थांबेपर्यत, तो थांबणार नाहिच, शेवटी घरी ये
साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये
आता नवर्याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का?
दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल
त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल
तो विचारेल तूला तुझ्या भिजण्याचं कारण, तू म्हणं घर गळतयं
मग चहा कर, तूही घे
तो उठून पंकज उधास लावेल, तो तू बंद कर
किशोरीचं सहेलारे लाव, बघ माझी आठवण येते का?
मग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस
पण तुही तसचं म्हणं
विजांचा कडकडात होईल, ढ़गांचा गडगडाट होईल
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्या शरीराकडे बघ
बघ माझी आठवण येते का?
यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर
यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर
येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी, बघ माझी आठवण येते का?
बघ माझी आठवण येते का?
हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी
इवलसं तळं पिऊन टाक
बघ माझी आठवण येते का?
वार्याने उडणारे पावसाचे थेंब चेहर्यावर घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो
नाहिच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये
तो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभी रहा
वाळू सरकेल पायाखाली, बघ माझी आठवण येते का?
मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे
चालत रहा पाऊस थांबेपर्यत, तो थांबणार नाहिच, शेवटी घरी ये
साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये
आता नवर्याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का?
दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल
त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल
तो विचारेल तूला तुझ्या भिजण्याचं कारण, तू म्हणं घर गळतयं
मग चहा कर, तूही घे
तो उठून पंकज उधास लावेल, तो तू बंद कर
किशोरीचं सहेलारे लाव, बघ माझी आठवण येते का?
मग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस
पण तुही तसचं म्हणं
विजांचा कडकडात होईल, ढ़गांचा गडगडाट होईल
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्या शरीराकडे बघ
बघ माझी आठवण येते का?
यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर
यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर
येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी, बघ माझी आठवण येते का?
चांदण्यात फिरताना...
चांदण्यात फिरताना माझा धरलास हात
सखया रे आवर ही सावर ही चांदरात
निजलेल्या गावातून आले मी एकटीच
दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच
या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात
सांग कशी तुजविणाच पार करु पुनवपूर
तुज वारा छळवादी अन् हे तारे फितूर
श्वास तुझा मालकंस, स्पर्श तुझा पारिजात
जाऊ चल परत गडे, जागले न घर अजून
पण माझी तुळस तिथे गेली हिरमसून
तुझिया नयनात चंद्र, माझ्या हृदयी प्रभात
सखया रे आवर ही सावर ही चांदरात
निजलेल्या गावातून आले मी एकटीच
दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच
या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात
सांग कशी तुजविणाच पार करु पुनवपूर
तुज वारा छळवादी अन् हे तारे फितूर
श्वास तुझा मालकंस, स्पर्श तुझा पारिजात
जाऊ चल परत गडे, जागले न घर अजून
पण माझी तुळस तिथे गेली हिरमसून
तुझिया नयनात चंद्र, माझ्या हृदयी प्रभात
या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे
या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे
चंचल वारा या जल धारा, भिजली काळी माती
हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती
फुले लाजरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे
रंगांचा उघडूनिया पंखा, सांज कुणीही केली
काळोखाच्या दारावरती, नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे
बाळाच्या चिमण्या ओठांतून, हाक बोबडी येते
वेलीवरती प्रेम प्रियेचे, जन्म फुलांनी घेते
नदीच्या काठी सजणा साठी, गाणे गात झुरावे
या ओठांनी चुंबून घेईन, हजारदा ही माती
अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्या साठी
इथल्या पिंपळ पानावरती, अवघे विश्र्व तरावे
चंचल वारा या जल धारा, भिजली काळी माती
हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती
फुले लाजरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे
रंगांचा उघडूनिया पंखा, सांज कुणीही केली
काळोखाच्या दारावरती, नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे
बाळाच्या चिमण्या ओठांतून, हाक बोबडी येते
वेलीवरती प्रेम प्रियेचे, जन्म फुलांनी घेते
नदीच्या काठी सजणा साठी, गाणे गात झुरावे
या ओठांनी चुंबून घेईन, हजारदा ही माती
अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्या साठी
इथल्या पिंपळ पानावरती, अवघे विश्र्व तरावे
तू दूर दूर तेथे, हूरहूर मात्र येथे...
तू दूर दूर तेथे, हूरहूर मात्र येथे
विरहात रात्र मोठी प्रेमीजनांस वाटे
शब्दात सांगू कैसे ते दुःख अंतरीचे
ओलावले दवांत ते काठ पापण्यांचे
भरला स्वरात कंप, कंपात भाव दाटे
मी भाबडी मनाची आहेच स्वप्नवेडी
विरुनी तुझ्यात जावे ही एक आस वेडी
राहो अभंग प्रीती, राहो अभंग नाते
भाळावरी असे हे सौभाग्य लाल कुंकू
विक्राळ काळ येता दोघे तयास जिंकू
स्फुरता मनात आशा, ओठांत गीत येते
विरहात रात्र मोठी प्रेमीजनांस वाटे
शब्दात सांगू कैसे ते दुःख अंतरीचे
ओलावले दवांत ते काठ पापण्यांचे
भरला स्वरात कंप, कंपात भाव दाटे
मी भाबडी मनाची आहेच स्वप्नवेडी
विरुनी तुझ्यात जावे ही एक आस वेडी
राहो अभंग प्रीती, राहो अभंग नाते
भाळावरी असे हे सौभाग्य लाल कुंकू
विक्राळ काळ येता दोघे तयास जिंकू
स्फुरता मनात आशा, ओठांत गीत येते
तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला...
तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला
माझ्यामनी प्रीत तुझी घेते हिंदोळा
गायिलेस डोळयांनी एक निळे गाणे
बट हळवी वार्यातील वेचिते तराणे
नकळत तव हात प्रिये हाती मम आला
पवनातूनी शीतलता दाटूनिया आली
दोन मने प्रीतीच्या गंगेतच न्हाली
आसमंत आनंदी धूंद धूंद झाला
ही दुपार भिजलेली, प्रीत चांदण्यात
मिटून पंख खग निवांत शांत तरुलतांत
आज तुझ्या सहवासी जीव धन्य झाला
माझ्यामनी प्रीत तुझी घेते हिंदोळा
गायिलेस डोळयांनी एक निळे गाणे
बट हळवी वार्यातील वेचिते तराणे
नकळत तव हात प्रिये हाती मम आला
पवनातूनी शीतलता दाटूनिया आली
दोन मने प्रीतीच्या गंगेतच न्हाली
आसमंत आनंदी धूंद धूंद झाला
ही दुपार भिजलेली, प्रीत चांदण्यात
मिटून पंख खग निवांत शांत तरुलतांत
आज तुझ्या सहवासी जीव धन्य झाला
शनिवार, २३ जानेवारी, २०१०
अजूनही तिन्हीसांज
चंदनाचा की चौरंग वर चांदीचे आसन
मायबाई अन्नपूर्णा रांगणारा बालकृष्ण
बाजूलाच सोनहंसी उभी चोचीत घेऊन
कांचनाची दीपकळी तिचे हळवे नर्तन
ओवाळाया आतुरसे पुढे तांब्याचे ताम्हन
हिलारती निरांजन उदवात धूपदान
तजेलशी गुलबास आणि नैवेद्याचा द्रोण
समोरच्या पाटावर लक्ष्मी घराची येणार
रोजचीच तिन्हीसांज मागे उभी राहणार
अजूनही तिन्हीसांज रोज येतच राहते
निरागस विध्वंसाच्या ढिगावरती टेकते
काळा धूर, लाल जाळ रास राखेची पाहते
काळोखाच्या ओढणीने डोळे टिपत राहते
- इंदिरा संत
मायबाई अन्नपूर्णा रांगणारा बालकृष्ण
बाजूलाच सोनहंसी उभी चोचीत घेऊन
कांचनाची दीपकळी तिचे हळवे नर्तन
ओवाळाया आतुरसे पुढे तांब्याचे ताम्हन
हिलारती निरांजन उदवात धूपदान
तजेलशी गुलबास आणि नैवेद्याचा द्रोण
समोरच्या पाटावर लक्ष्मी घराची येणार
रोजचीच तिन्हीसांज मागे उभी राहणार
अजूनही तिन्हीसांज रोज येतच राहते
निरागस विध्वंसाच्या ढिगावरती टेकते
काळा धूर, लाल जाळ रास राखेची पाहते
काळोखाच्या ओढणीने डोळे टिपत राहते
- इंदिरा संत
आई
कळ्या माझ्या आनंदाच्या
साठवील्या माझ्याकडे,
फुलवाया तुझ्यापुढे.
आसवे मी साठवली
पापणीच्या काठोकाठ,
तुझ्यापाशी देण्या वाट.
ठरवले मानापाशी,
बोलावयाचे कितितरी,
निजुनिया मांडीवरी.
किती लांब वाटे काळ,
आई कधी भेटशील?
जीव झाल उतवीळ.
- इंदिरा संत
साठवील्या माझ्याकडे,
फुलवाया तुझ्यापुढे.
आसवे मी साठवली
पापणीच्या काठोकाठ,
तुझ्यापाशी देण्या वाट.
ठरवले मानापाशी,
बोलावयाचे कितितरी,
निजुनिया मांडीवरी.
किती लांब वाटे काळ,
आई कधी भेटशील?
जीव झाल उतवीळ.
- इंदिरा संत
चुकून-चुकून
चुकून चुकून कधींतरी डोळ्यांना डोळे
भेटले असतील, नसतील.
चुकून-चुकून कधींतरी चार शब्द
दिले घेतले असतील, नसतील …
शुकून-चुकूनमधले अचूक उभें करणारे-
असतील-नसतील मधल्या क्षणांचे स्पंदन
स्थिर करणारें
एकामागून एक कवचें निघळून मनासारख्या
नितळ संगमरवराचें घडलेलें तें शिल्प …
त्याचें अस्तित्व हेंच सर्वस्व. जोखीम जपून ठेवायची.
त्याचें दर्शन हीच शिक्षा. मुकेपणानें सोसायची.
-' गर्भरेशीम ' इंदिरा संत
भेटले असतील, नसतील.
चुकून-चुकून कधींतरी चार शब्द
दिले घेतले असतील, नसतील …
शुकून-चुकूनमधले अचूक उभें करणारे-
असतील-नसतील मधल्या क्षणांचे स्पंदन
स्थिर करणारें
एकामागून एक कवचें निघळून मनासारख्या
नितळ संगमरवराचें घडलेलें तें शिल्प …
त्याचें अस्तित्व हेंच सर्वस्व. जोखीम जपून ठेवायची.
त्याचें दर्शन हीच शिक्षा. मुकेपणानें सोसायची.
-' गर्भरेशीम ' इंदिरा संत
मैत्रीचा बोन्साय झालाय....
बोन्सायअरे आजच्या जगात
मैत्रीचा बोन्साय झालाय.
शाळेत बागडलेली मैत्री
कॉलेज मधे उपवर झाली,
“आयुष्यभर सोबत हवी” म्हणताना
या (धावत्या) आयुष्यात तिचाच विसर पडलाय…
जिवलग म्हणवणारे सारे
इतके कसे दुरावले ?
त्यांच्याच आठवणींचे अश्रु बनुन
फक्त नजरेत उतरणं चाललंय.
म्हणुन वाटतं मैत्रीचा बोन्साय झालाय.
वेळे अगोदर हजर असणा-यांना
कसा आज ’वेळ’ कमी पडलाय,
शब्दा पलीकडच्या बोलण्याला
कसा आज शब्दांचाच अभाव आलाय.
जणु भावनांची मुळे खुंटली,
पण आठवणींचा ओलाव्याने तग धरलाय.
म्हणुनच एवढ्या मोठया वट वॄक्षासारख्या
मैत्रीचा बोन्साय झालाय.
मैत्रीचा बोन्साय झालाय.
शाळेत बागडलेली मैत्री
कॉलेज मधे उपवर झाली,
“आयुष्यभर सोबत हवी” म्हणताना
या (धावत्या) आयुष्यात तिचाच विसर पडलाय…
जिवलग म्हणवणारे सारे
इतके कसे दुरावले ?
त्यांच्याच आठवणींचे अश्रु बनुन
फक्त नजरेत उतरणं चाललंय.
म्हणुन वाटतं मैत्रीचा बोन्साय झालाय.
वेळे अगोदर हजर असणा-यांना
कसा आज ’वेळ’ कमी पडलाय,
शब्दा पलीकडच्या बोलण्याला
कसा आज शब्दांचाच अभाव आलाय.
जणु भावनांची मुळे खुंटली,
पण आठवणींचा ओलाव्याने तग धरलाय.
म्हणुनच एवढ्या मोठया वट वॄक्षासारख्या
मैत्रीचा बोन्साय झालाय.
शनिवार, २ जानेवारी, २०१०
दुखविल्यानंतर.........
अनावश्यक असे हा जन्म मित्रांनो
जगा माझ्यापरी थोडे पवित्रांनो
मला बोलावणी येती बिघडण्याची
तुम्ही लखलाभ तुम्हाला चरित्रांनो
मजा बरबाद होण्याची नका भोगू
बसा भिंतीवरी निर्जीव चित्रांनो
कुठे अमरत्व तुम्हाला तरी आहे?
कशाच्या काळज्या करता विचित्रांनो?
सुचे कविता मनाला दुखविल्यानंतर...
जपा सातत्य हे उर्जाजनित्रांनो
जगा माझ्यापरी थोडे पवित्रांनो
मला बोलावणी येती बिघडण्याची
तुम्ही लखलाभ तुम्हाला चरित्रांनो
मजा बरबाद होण्याची नका भोगू
बसा भिंतीवरी निर्जीव चित्रांनो
कुठे अमरत्व तुम्हाला तरी आहे?
कशाच्या काळज्या करता विचित्रांनो?
सुचे कविता मनाला दुखविल्यानंतर...
जपा सातत्य हे उर्जाजनित्रांनो
तुझा सहवास
तुझा सहवास-
जसा पहाटेचा वारा
फूले फूल झरझरा
तुझा सहवास-
झिरी झीरे चांदण्यांचा
मधुरसा उन्मादाचा
तुझा सहवास-
तुझ्या ह्रुदयीची तार
काढीतसे गोड सूर
तुझा सहवास-
कोमलता काव्याहून
मादकता गानाहून
तुझा सहवास
धरेवरी नाही मोल
जीव घेई कुठे तोल
तुझा सहवास-
आहे कसा- कशापरी?
कविताही मूक परी
इंदिरा संत
जसा पहाटेचा वारा
फूले फूल झरझरा
तुझा सहवास-
झिरी झीरे चांदण्यांचा
मधुरसा उन्मादाचा
तुझा सहवास-
तुझ्या ह्रुदयीची तार
काढीतसे गोड सूर
तुझा सहवास-
कोमलता काव्याहून
मादकता गानाहून
तुझा सहवास
धरेवरी नाही मोल
जीव घेई कुठे तोल
तुझा सहवास-
आहे कसा- कशापरी?
कविताही मूक परी
इंदिरा संत
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)