सप्तरंग
वेगवेगळ्या रंगाच्या, वेगवेगळ्या अंगाच्या, काही माझ्या, काही मला आवडलेल्या कविता आणि लेख...... कदाचित तुम्हालाही आवडतील...
माझी ब्लॉग सूची
मंगळवार, २० डिसेंबर, २०११
रविवार, १८ डिसेंबर, २०११
ए….तू रागाऊ नकोस रे…
कवितेला तुझ्या प्रत्येक
सुंदर,छान,अप्रतिम,तुफान..
मी होणार आहे तुझी टीकाकार
हो टीकाकारच…..विचार ना का????
वाटत तुझ्या शब्दाणी खूप खूप बोलाव
गूढ-गूढ,खोल खोल आशय घन असाव
रथी-महारथीच्या बरोबरीला तू याव
आणि मग तुला कोणी स्पर्धकच ना उराव.
मी होणार आहे तुझी टीकाकार
हो टीकाकारच……विचार ना का???
वाटत तुझ्या कवीतानी खूप भरारी घ्यावी
वेगवेगळ्या विषयांची त्याला छान झालर असावी
कवितेची प्रत्येक ओळ अर्थपूर्ण असावी
उगाच त्याच त्याच विषयांची नेहमी गर्दी नसावी
मी होणार आहे तुझी टीकाकार
हो टीकाकारच……..विचार ना का?????
वाटता माझी टीका तू खूप मनावर घ्यावी
आणि एक-एक रत्न तुझ्या लेखणीतून बाहेर पडावि
तुझ्या कविता ह्या प्रान्तातल्या शेवटचा शबद ठरावा
तुझ्या नंतर तुझ्या कविता अनमोल होऊन उराव्या
मी होणार आहे तुझी टीकाकार
हो टीकाकारच……विचार ना का???
वाटत व्हाव विराजमान तू प्रसिद्धीच्या शिखरावर
अस्सल प्रतिभा खणखनावी तुझ्या प्रत्येक कवितेतून
पाहीन मी ईथुन तुला यशाच्या खुर्चिवर
अश्रू असतील डोळ्यात माझ्या आनंदाचे भरभरून
मग होऊ ना मी टीकाकार तुझी…
ए……..तू रागाऊ नकोस रे
मंगळवार, ६ डिसेंबर, २०११
"जीवन कळले नाही ग"
मला पाहुनी हसतो आहे मृत्यु माझ्या दारी ग
कशी चुकविली मल्हाराची या विठुने वारी ग.
...
जगान्याच्याही पलीकडून तो देतो आहे ग्वाही ग
भकास जीवन संपेल तेव्हा जन्मणार मी नाही ग.
जीवन कळले नाही ग ..
झाडे ,सूर्य, नदी अजूनही येते उगवते वाहते ग
अंतरातुन आवाज आता त्यांचा कोणी पाहते ग.
धमन्या मधुनी वाहत जाते रंग तरंग काही ग
कालोखाच्या या पटलावर चंद्र अजूनही नाही ग .
जीवन कळले नाही ग ...
सोमवार, ५ डिसेंबर, २०११
आभास हा, आभास हा......
कधी दूर दूर कधी तू समोर
मन हरवते आज का
का हे कसे होते असे
हि आस लागे जीवा
कसा सावरू मी आवरू गं मी स्वतः
... दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला छळतो मला
आभास हा, आभास हा
कधी दूर दूर कधी तू समोर
मन हरवते आज का
का हे कसे होते असे
हि आस लागे जीवा
कशी सावरू मी आवरू रे मी स्वतः
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला छळतो मला
आभास हा, आभास हा
क्षणात सारे उधान वारे झुळूक होऊन जाती
कधी दूर तू हि कधी जवळ वाटे
पण काहीच नाही हाती
मी अशीच हसते उगीच लाजते
पुन्हा तुला आठवते
मग मिटून डोळे तुला पाहते
तुझ्याच साठी सजते
तू नसताना असल्याचा खेळ हा
दिसे स्वप्ना का हे जगताना मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला छळतो मला
आभास हा, आभास हा
मनात माझ्या हजार शंका
तुला मी जाणू कसा रे
तू असाच आहेस तसाच नाहीस
आहेस खरा कसा रे
तू इथेच बस ना हळूच हस ना
अशीच हवी मला तू
पण माहित नाही मला हि अजुनी
तशीच आहेस का तू
नवे रंग सारे नवी वाटे हि हवा
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला छळतो मला
आभास हा, आभास हा
कधी दूर दूर कधी तू समोर
मन हरवते आज का
का हे कसे होते असे
हि आस लागे जीवा
कशी सावरू मी आवरू रे मी स्वतः
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला छळतो मला
आभास हा, आभास हा
आठवणी............
बसले होते एकांतात आठवल्या त्या आठवणी
... काही पुसटश्या तर काही दिसेनाश्या......
काहींना लागलेला गंज
... तर काही अडगळीत पडलेल्या
वर्षानुवर्ष जपलेल्या
पण म्हाताऱ्या झालेल्या.....
काही अलीकडच्याच स्वप्नात झुलत होत्या
स्वताला न्याहाळत आकर्षित करत होत्या
त्यातही काही गोड तर काही कडू होत्या
काही सुखद तर काही दुखद......
जवळ कोणी नसताना
सोबत असल्याचा धीर देतात
फेकल्या कितीही दूर तरी
जीवनाचा आधार बनतात.....
किती विचित्र असतात या आठवणी
पण एकांतात साथ आपली देतात.....
मनात दुख असतानाही
चेहऱ्यावर हास्य आणतात...
गुरुवार, १ डिसेंबर, २०११
पाहू गं किती वाट.....
बरीच रात्र झाली काय करु आतां? भयाण काळोख चहूकडे पसरलायं. पुस्तक टाकलं, गादीवर पडले. पण छे! नाही गं चैन तुझ्याशिवाय. लवकर ये ना! मनाला किती समजावून सांगितलं किं- वाट पाहू नको, पण कसे होणार? तुझ्याविणा कसतरी होतयं. कंटाळून शेवटी जांभया येताहेत. अरेच्चा......! यायला लागलीस तु? तरीचं म्हटलं. जांभया कशा आल्या. दूतांना पुढे पाठवलं वाटतं! बरं! चला तूंहि आलीस. आत पुस्तक नको.दीवा नको. झोपलेलं बरं! उद्याच उद्या. झोप आली हं..!
जीवन म्हणजे तडजोड....
कुणी म्हणतात-जीवन हा संग्राम आहे. संग्राम हा नाही कुठे? साधी वस्तू विकत घेतानासुद्धा लोक संग्रामाच्या तयारीने जातात. एक शेजारीण दुसरीशी बोलताना वाकयुद्धाच्या सामुग्रीनिशी हल्ला करते. अशा युद्ध प्रव्रुत्तीने तुडूंब भरलेल्या लोकांना हवे तर म्हणू देत. "-जीवन हा संग्राम आहे!" जीवनात संग्रामातील क्रौर्य दिसणार नाही. युद्धातील रक्तपात येथे दिसणार नाही. क्रौर्याऐवजी निसर्गाची ममता आणि रक्ताच्या लाल रंगाऐवजी अरुणोदयाचा लाल रंगच निसर्गाला जास्त प्रिय आहे. निसर्ग वस्तू निर्माण करतो. काळ वाईट गोष्टी हिरावुन घेतो. अशा तर्हेने निसर्ग आणि काळ यांची नेहमीच तडजोड चाललेली असते. काळ सांगतो "-निसर्गा, नको रे असल्या गोष्टी." निसर्ग मात्र आपला बालहट्ट चालुच ठेवतो. पण काळ त्याला दूर भविष्याकडे बोट दाखवतो. व त्याला खेळायला पाठवून देतो, व त्याच्या जवळील वाईट गोष्टी आपण काढून घेतो, जसे-आई.. आई मुलाच्या हातातील काठी वगैरॆ काढून घेते. निसर्ग आणि काळ जर तडजोड करतात. तर मग निसर्गाच्या प्रशांत मांडीवर खेळणार्या आपल्या जीवनाला तडजोडींचे महत्व नाही काय?
निसर्गाने निर्माण केलेल्या मानवाचे जगणे म्हणजेच जीवन. जीवनसागरात होडी हाकारली की सुकाणू कोणत्या दिशेने फिरवावा याचा विचार माणूस करु लागतो. मार्गात त्याला व्यवहाराचे खडक लागतात. आपली नौका तेथे आपटून फूटू नये, म्हणून त्यांना वळसा घालुन घालुन जावे लागते. पाण्याचा वेग वाढला कि आपली होडी तीरावर आणून थोडावेळ थांबावे लागते. संसाराच्या रखरखीत जागेत प्रेमाचे व्रुक्ष लावून सावली निर्माण केली जाते. थंडीने काकडल्या जाणार्या देहाला लोकरीची वेश्रुणे घातली जातात. ही सगळी तडजोड नव्हे काय? भूक लागली कि जेवणे तहान लागली कि पाणी पिणे. या साध्या गोष्टीतून सूद्धा तडजोडचं प्रगट होत नाहे काय?
मनुष्य म्हणेल-" भूक लागली तरी मी जेवणार नाही." पोट म्हणेल- "बरं! मीही आपले काम करणार नाही, काम बंद ठेवीन."संपले! सुरू झाला झगडा.. अशा संग्रामाने जीवन जगू शकणार नाही. प्रत्येक गोष्टीत तडजोड करावी लागते.. रोजचा व्यवहार घ्या. पाच मिनीटांचा मार्ग. बसमधुन जाताना आपण स्वतः बसलेल्या असतो. व एखादी बाई लहान मुलाला घेऊन बसमध्ये चढते. अशावेळी तिला जागा करुन देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. नाहीतर तीने जागा द्या म्हणावे आणि आपण भांडावे, नाही म्हणावें. हा संग्राम करण्यापेक्षा तडजोड करुन माणूसकीचे पालन करणे जास्त श्रेयस्कर नाही काय? अशा तर्हेने आई-मूल, नवरा-बायको, भावंडे इ. आसपासचे लोक, प्रत्येक प्राणी, व्यवहार यांच्याशी तडजोड न करताच जगणे अशक्य आहे. संग्राम हा जीवनातील थोडासा भाग होवू शकेल पण जीवन नव्हे. संग्राम जीवनाचा थोडा भाग असेल पण तडजोड म्हणजेच पुर्ण जीवन!
बुधवार, १६ नोव्हेंबर, २०११
स्वप्नांची परीक्रमा…
सांभाळते आता मीच माझं स्वप्नं….
देणार नाही तूला…..चुकूनही उसनं….
मागणार नाही तूझ्याकडे आभाळ रंगाचे…..!!
माझी स्वप्नं अलगद पापण्यांवर ठेवेन माझ्या….
मागीतली तरी तु ……देणार नाही तूला….
तशी आधीपसूनच जपते …..फूलपाखरं स्वनांची….
फूलपाखरंच ती रे……एकजात हळवी….!!!
पायवाट होती फूलांची……काळजात छळवी….
स्वप्नांचे वेचे घातले ओच्यात माझ्या…..
दिली गर्भरेशमी नक्काशी….तूच ना रे पदराला….
बघून येते माझी मीच आधीसारखी…
नाहीतरी एकटीच होते….राहीन एकटी…
येवू नकोस… आता तिथेच तु थांब…..अस्साच रहा उभा….
मी करून येते स्वप्नांची परीक्रमा…..
फूलांसारखी स्वप्ने येतात का रे आभाळाला…??
कारण…..
कोणाच्यातरी स्वप्नांनी आज…
केली म्हणे…..आत्महत्या…!!!
मी तिला विचारलं -मंगेश पाडगांवकर
मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......
तुम्ही म्हणाल , यात विशेष काय घाडलं?
त्यालाच कळेल, ज्याचं असं मन जडलं........
तुमचं लग्न ठरवुन झालं?
कोवळेपण हरवुन झालं?
देणार काय? घेणार काय?
हुंडा किती,बिंडा किती?
याचा मान,त्याचा पान
सगळा मामला रोख होता,
व्यवहार भलताच चोख होता..
हे सगळं तुम्हाला सांगुन तरी कळणार कसं
असलं गाणं तुमच्याकडं वळणार कसं...
ते सगळं जाउ द्या, मला माझं गाणं गाउ द्या..
मी तिला विचारल,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......
त्या धुंदीत,त्या नशेत, प्रत्येक क्षण जागवला,
इराण्याच्या हॉटेलात,
चहासोबत मस्कापाव मागवला
तेवढीसुद्धा ऐपत नव्हती,असली चैन झेपत नव्हती,
देवच तेव्हा असे वाली,खिशातलं पाकीट खाली
त्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडत
पोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते बघत
जीव असा तरंगतो तेव्हा भय असणार कुठलं?
मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......
मग एक दिवस,
चंद्र, सुर्य, तारे, वारे,
सगळं मनात साठवलं,
आणि थरथरणाऱ्या हातांनी ,
तिला प्रेमपत्रं पाठवलं
आधिच माझं अक्षर कापरं
त्या दिवशी अधिकचं कापलं
रक्ताचं तर सोडाच राव
हातामधलं पेनसुद्धा होतं तापलं
पत्र पोस्टात टाकलं आणि आठवलं,
पाकिटावर तिकिट नव्हतं लावलं
पत्रं तिला पोचलं तरिसुद्धा
तुम्हाला सांगतो,
पोष्टमन तो प्रेमात पडला असला पाहिजे,
माझ्यासारखाच त्याचासुद्धा कुठेतरी जीव जडला असला पाहिजे
मनाच्या फ़ांदीवर,
गुणी पाखरु येउन बसलं
मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं......
पुढे मग तिच्याशिच लग्नं झालं,मुलं झाली,
संगोपन बिंगोपन करुन बिरुन शिकवली
मी तिच्या प्रेमाखातर नोकरीसुद्धा टिकवली...
तसा प्रत्येकजण नेक असतो,
फ़रक मात्र एक असतो
कोणता फ़रक?
मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......
नावात काय आहे?
नावात काय आहे असे म्हणतो ना आपण
नावात काय आहे?
मग नावात काहीही नाही तर जातीत काय आहे?
भाषेत काय आहे आणि पंथात काय आहे?
कोण म्हणाले ही २१वी सदी आहे म्हणून?
प्रत्येकाला स्वतःच्या मतानुसार वागायचा हक्क आहे?
असे आहे का?
बघा तुम्ही स्वतःलाच विचारुन
नेत्याने पक्ष बदलला की लगेच
कार्यकर्ते पक्ष बदलतात
त्यानंतर मग आम्हालाही मागे मागे जावे लागते
इच्छा नसते त्या पक्षाचे मग व्हावे लागते
हीच का २१ वी सदी?
नेत्यांनाच स्वतःचे अस्तित्त्व नाही तर
ते आमचे भविष्य काय घडवणार?
मतांसाठी खेळ सारा हा
मतदार राजा आता तरी जागा हो
योग्य ते सरकार निवड
आणि मराठ्यांचे भविष्य घडव
जय महाराष्ट्र म्हणायला गर्व वाटू दे
मराठी माणूस म्हणून जगायला गर्व वाटू दे
जय महाराष्ट्र ............. ......... ....

