माझी ब्लॉग सूची

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०११

स्वप्नांची परीक्रमा…

सांभाळते आता मीच माझं स्वप्नं….

देणार नाही तूला…..चुकूनही उसनं….

जमतील तसे फटकारे मारीन ब्रशचे…..
मागणार नाही तूझ्याकडे आभाळ रंगाचे…..!!
माझी स्वप्नं अलगद पापण्यांवर ठेवेन माझ्या….
मागीतली तरी तु ……देणार नाही तूला….
तशी आधीपसूनच जपते …..फूलपाखरं स्वनांची….
फूलपाखरंच ती रे……एकजात हळवी….!!!
पायवाट होती फूलांची……काळजात छळवी….
स्वप्नांचे वेचे घातले ओच्यात माझ्या…..
दिली गर्भरेशमी नक्काशी….तूच ना रे पदराला….

बघून येते माझी मीच आधीसारखी…
नाहीतरी एकटीच होते….राहीन एकटी…
येवू नकोस… आता तिथेच तु थांब…..अस्साच रहा उभा….
मी करून येते स्वप्नांची परीक्रमा…..
फूलांसारखी स्वप्ने येतात का रे आभाळाला…??

कारण…..
कोणाच्यातरी स्वप्नांनी आज…
केली म्हणे…..आत्महत्या…!!!

मी तिला विचारलं -मंगेश पाडगांवकर

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......

तुम्ही म्हणाल , यात विशेष काय घाडलं?
त्यालाच कळेल, ज्याचं असं मन जडलं........

तुमचं लग्न ठरवुन झालं?
कोवळेपण हरवुन झालं?
देणार काय? घेणार काय?
हुंडा किती,बिंडा किती?
याचा मान,त्याचा पान
सगळा मामला रोख होता,
व्यवहार भलताच चोख होता..
हे सगळं तुम्हाला सांगुन तरी कळणार कसं
असलं गाणं तुमच्याकडं वळणार कसं...

ते सगळं जाउ द्या, मला माझं गाणं गाउ द्या..
मी तिला विचारल,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......

त्या धुंदीत,त्या नशेत, प्रत्येक क्षण जागवला,
इराण्याच्या हॉटेलात,
चहासोबत मस्कापाव मागवला
तेवढीसुद्धा ऐपत नव्हती,असली चैन झेपत नव्हती,
देवच तेव्हा असे वाली,खिशातलं पाकीट खाली
त्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडत
पोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते बघत
जीव असा तरंगतो तेव्हा भय असणार कुठलं?

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......

मग एक दिवस,

चंद्र, सुर्य, तारे, वारे,
सगळं मनात साठवलं,
आणि थरथरणाऱ्या हातांनी ,
तिला प्रेमपत्रं पाठवलं
आधिच माझं अक्षर कापरं
त्या दिवशी अधिकचं कापलं
रक्ताचं तर सोडाच राव
हातामधलं पेनसुद्धा होतं तापलं
पत्र पोस्टात टाकलं आणि आठवलं,
पाकिटावर तिकिट नव्हतं लावलं
पत्रं तिला पोचलं तरिसुद्धा
तुम्हाला सांगतो,
पोष्टमन तो प्रेमात पडला असला पाहिजे,
माझ्यासारखाच त्याचासुद्धा कुठेतरी जीव जडला असला पाहिजे

मनाच्या फ़ांदीवर,
गुणी पाखरु येउन बसलं

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं......

पुढे मग तिच्याशिच लग्नं झालं,मुलं झाली,
संगोपन बिंगोपन करुन बिरुन शिकवली
मी तिच्या प्रेमाखातर नोकरीसुद्धा टिकवली...

तसा प्रत्येकजण नेक असतो,
फ़रक मात्र एक असतो
कोणता फ़रक?

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......

नावात काय आहे?






नावात काय आहे असे म्हणतो ना आपण
नावात काय आहे?

मग नावात काहीही नाही तर जातीत काय आहे?
भाषेत काय आहे आणि पंथात काय आहे?

कोण म्हणाले ही २१वी सदी आहे म्हणून?
प्रत्येकाला स्वतःच्या मतानुसार वागायचा हक्क आहे?
असे आहे का?
बघा तुम्ही स्वतःलाच विचारुन

नेत्याने पक्ष बदलला की लगेच
कार्यकर्ते पक्ष बदलतात
त्यानंतर मग आम्हालाही मागे मागे जावे लागते
इच्छा नसते त्या पक्षाचे मग व्हावे लागते
हीच का २१ वी सदी?

नेत्यांनाच स्वतःचे अस्तित्त्व नाही तर
ते आमचे भविष्य काय घडवणार?

मतांसाठी खेळ सारा हा
मतदार राजा आता तरी जागा हो
योग्य ते सरकार निवड
आणि मराठ्यांचे भविष्य घडव

जय महाराष्ट्र म्हणायला गर्व वाटू दे
मराठी माणूस म्हणून जगायला गर्व वाटू दे


जय महाराष्ट्र ............. ......... ....

माज्या बा चा बा..........

माज्या बा चा बा
व्हता माणुस लई येगळा
पटका लाल डोई वरती
अंगी डगला व्हता ढगळा....

... माजा बा जवा मला
सांगी त्याची ही कहाणी
मनात होई चर चर..
होई काळजाच पाणी पाणी...

जीवाभावाची त्याची सोबतीण
असायची नेहमीच आजारी....
पण ह्यो गडी व्हता लई भारी
एकट्यानच पोसली...दोन पोरं चार पोरी..

व्हता नावावर त्याच्या
एक तुकडा भुई चा
होती कूस तिची वांझोटी
न दिसे कण गवताचा

राबून दिसभर....दुसऱ्याच्या शेती
घरी येई हा घेउन..घामी भिजलेला पैका
ठेवी एक एक आणं, एका एका हाती
मागे बदल्यात त्याच्या..गालावरी एक मुका...

राती निजल्यावर माजा बा
ठेवी हात त्याच्या डोई वर
बोली आपल्याच मनाशी
"माजा ल्योक, व्हईल मोटा हाफिसर "

झाला हैराण.... केलं साऱ्या जीवाचं एक रानं
ठेवून स्वतःला गहाण ...जोडले दोन पैके यानं हाती
दुसऱ्याच दिशी .....भल्या रामाचिया पारी ....
सोडून आला माज्या बा ला ...दूर शाळंच्या दारी

माज्या बा न ही मग... धरला एकच तो ध्यास
करून दाखवेन सार्थ ....त्याच्या बा चा विश्वास
केल प्रयत्न अथक ...मिळविला फस्क्लास.... (फर्स्ट क्लास)
सांगाया गेला गावी ...बातमी ही ख़ास...

ऐकून पोराचा निकाल...डोळं झाली त्याची लाल
उलट्या हातानं पुसताना डोळे...
माज्या बा न बघितली...त्याच्या तळहातावरली फोड़े
नाही रडला माजा बाप... दाबून हुंदका आतल्या आत
गेला परत तो शाळंत... बांधून मनाशी खुणगाठं

काही वरसानी माजा बा... मोटा हाफिसर जाला...
बाप तवा त्याचा...व्हता खिळला बाजंला
जवा ऐकली त्यानं...बातमी ही लाख मोलाची..
धडपडला बाजंतुन...निघाला टेकवित काठी...
पुसता माज्या बा नं..बोलला माघारी वळून..
चाललो फेडाया नवस..केला होता तुज्यासाठी...
तवा मातर माजा बा...रडला डोळे भरून....

माझ्या आजोबाच्या फोटुवरील हारातल्या झेंडू प्रमाणं
आज बी माझ्या बा च्या डोळ्यातलं पाणी ताजंच व्हतं.....

बुधवार, २ नोव्हेंबर, २०११

करून करून काळजी माझी...........

करून करून काळजी माझी करून करून लाड
दमलात तुम्ही आई-बाबा झोप जरा गाढ !!

मागणार नाही उगाच खाऊ मागणार नाही खेळ
लवकर उठीन आवरायला लावणार नाही वेळ
शाळेमध्ये जाईन रोज सगळा डबा खाईन
अभ्यास करीन, टीव्हीसुद्धा थोड्याच वेळ पाहीन
देवापुढे लावीन दिवा, जेवण करीन मस्त
वरण भात भाजी चटणी सगळ करीन फस्त
शेपुचीही भाजी सांगेन आई दोनदा वाढ !!

वागणार नाही वाईट काही राखेन तुमच नाव
माझे आई बाबा म्हणून ओळखेल तुम्हा गाव
लवकर लवकर शिकीन आणि लवकर मोठ्ठा होईन
बाबासारखे ऑफिसातून पैसे घेऊन येईन
वणवण करतो बाबा त्याचे करीन थोडे काम
दमला तोही त्याला आता मिळूदे आराम
ना..ना ना न ना.. ना.. ना.. ना.. ना..

घट्ट मीटा डोळे तुम्हा कुशीमध्ये घेतो
पांघरायाला माझ मऊ पांघरूण देतो
झालो आता मोठा सांगा छळेल तुम्हा कोणं?
आई-बाबा तुम्ही आता मुलं माझी दोन
पाहू नका आता असे नाते झाले नवे
मात्र आता तुम्ही माझे ऐकायला हवे
का रे बाबा मिशीमध्ये हसतोस असा?
आई बघा रडू लागे डोळे तिचे पुसा
हात जोडे आई, बाबा म्हणतो लबाड !

करून करून काळजी माझी करून करून लाड
दमलात तुम्ही आई-बाबा झोप जरा गाढ !!