चंदनाचा की चौरंग वर चांदीचे आसन
मायबाई अन्नपूर्णा रांगणारा बालकृष्ण
बाजूलाच सोनहंसी उभी चोचीत घेऊन
कांचनाची दीपकळी तिचे हळवे नर्तन
ओवाळाया आतुरसे पुढे तांब्याचे ताम्हन
हिलारती निरांजन उदवात धूपदान
तजेलशी गुलबास आणि नैवेद्याचा द्रोण
समोरच्या पाटावर लक्ष्मी घराची येणार
रोजचीच तिन्हीसांज मागे उभी राहणार
अजूनही तिन्हीसांज रोज येतच राहते
निरागस विध्वंसाच्या ढिगावरती टेकते
काळा धूर, लाल जाळ रास राखेची पाहते
काळोखाच्या ओढणीने डोळे टिपत राहते
- इंदिरा संत
वेगवेगळ्या रंगाच्या, वेगवेगळ्या अंगाच्या, काही माझ्या, काही मला आवडलेल्या कविता आणि लेख...... कदाचित तुम्हालाही आवडतील...
माझी ब्लॉग सूची
शनिवार, २३ जानेवारी, २०१०
आई
कळ्या माझ्या आनंदाच्या
साठवील्या माझ्याकडे,
फुलवाया तुझ्यापुढे.
आसवे मी साठवली
पापणीच्या काठोकाठ,
तुझ्यापाशी देण्या वाट.
ठरवले मानापाशी,
बोलावयाचे कितितरी,
निजुनिया मांडीवरी.
किती लांब वाटे काळ,
आई कधी भेटशील?
जीव झाल उतवीळ.
- इंदिरा संत
साठवील्या माझ्याकडे,
फुलवाया तुझ्यापुढे.
आसवे मी साठवली
पापणीच्या काठोकाठ,
तुझ्यापाशी देण्या वाट.
ठरवले मानापाशी,
बोलावयाचे कितितरी,
निजुनिया मांडीवरी.
किती लांब वाटे काळ,
आई कधी भेटशील?
जीव झाल उतवीळ.
- इंदिरा संत
चुकून-चुकून
चुकून चुकून कधींतरी डोळ्यांना डोळे
भेटले असतील, नसतील.
चुकून-चुकून कधींतरी चार शब्द
दिले घेतले असतील, नसतील …
शुकून-चुकूनमधले अचूक उभें करणारे-
असतील-नसतील मधल्या क्षणांचे स्पंदन
स्थिर करणारें
एकामागून एक कवचें निघळून मनासारख्या
नितळ संगमरवराचें घडलेलें तें शिल्प …
त्याचें अस्तित्व हेंच सर्वस्व. जोखीम जपून ठेवायची.
त्याचें दर्शन हीच शिक्षा. मुकेपणानें सोसायची.
-' गर्भरेशीम ' इंदिरा संत
भेटले असतील, नसतील.
चुकून-चुकून कधींतरी चार शब्द
दिले घेतले असतील, नसतील …
शुकून-चुकूनमधले अचूक उभें करणारे-
असतील-नसतील मधल्या क्षणांचे स्पंदन
स्थिर करणारें
एकामागून एक कवचें निघळून मनासारख्या
नितळ संगमरवराचें घडलेलें तें शिल्प …
त्याचें अस्तित्व हेंच सर्वस्व. जोखीम जपून ठेवायची.
त्याचें दर्शन हीच शिक्षा. मुकेपणानें सोसायची.
-' गर्भरेशीम ' इंदिरा संत
मैत्रीचा बोन्साय झालाय....
बोन्सायअरे आजच्या जगात
मैत्रीचा बोन्साय झालाय.
शाळेत बागडलेली मैत्री
कॉलेज मधे उपवर झाली,
“आयुष्यभर सोबत हवी” म्हणताना
या (धावत्या) आयुष्यात तिचाच विसर पडलाय…
जिवलग म्हणवणारे सारे
इतके कसे दुरावले ?
त्यांच्याच आठवणींचे अश्रु बनुन
फक्त नजरेत उतरणं चाललंय.
म्हणुन वाटतं मैत्रीचा बोन्साय झालाय.
वेळे अगोदर हजर असणा-यांना
कसा आज ’वेळ’ कमी पडलाय,
शब्दा पलीकडच्या बोलण्याला
कसा आज शब्दांचाच अभाव आलाय.
जणु भावनांची मुळे खुंटली,
पण आठवणींचा ओलाव्याने तग धरलाय.
म्हणुनच एवढ्या मोठया वट वॄक्षासारख्या
मैत्रीचा बोन्साय झालाय.
मैत्रीचा बोन्साय झालाय.
शाळेत बागडलेली मैत्री
कॉलेज मधे उपवर झाली,
“आयुष्यभर सोबत हवी” म्हणताना
या (धावत्या) आयुष्यात तिचाच विसर पडलाय…
जिवलग म्हणवणारे सारे
इतके कसे दुरावले ?
त्यांच्याच आठवणींचे अश्रु बनुन
फक्त नजरेत उतरणं चाललंय.
म्हणुन वाटतं मैत्रीचा बोन्साय झालाय.
वेळे अगोदर हजर असणा-यांना
कसा आज ’वेळ’ कमी पडलाय,
शब्दा पलीकडच्या बोलण्याला
कसा आज शब्दांचाच अभाव आलाय.
जणु भावनांची मुळे खुंटली,
पण आठवणींचा ओलाव्याने तग धरलाय.
म्हणुनच एवढ्या मोठया वट वॄक्षासारख्या
मैत्रीचा बोन्साय झालाय.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)