माझी ब्लॉग सूची

शुक्रवार, ४ डिसेंबर, २००९

चारोळ्या

चाल हवी स्वर हवा
गीत एखादे गाताना
जीद्द हवी उर्मी हवी
हे सुंदर जीवन जगताना

रस्त्याकडेची झाड
बिचारी निरागस उभीच असतात
कोण आला कोण गेला
मग एक दुसर्याला विचारत बसतात.

आठवतय ?
आपण पाना फुलांवरच दव पहायचो!
आणि त्या दवाच्या थेम्बातच परस्परांना न्याहालालायाचो

दिवस धळत होता
संध्याकाळ आपले पाय पसरत होती
आणि तुझी आठवण चोरपावलानी माझ्यात शिरकाव करत होती.


एकेकदा वाटत अस
स्वताला कवितेत पूर्ण पणे वर्णनाव,
पण जगासमोर स्वताला मांडून
आपण तरी आपल्यात कितपत उराव

शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २००९

एक व्यर्थ गीत

व्यर्थ या गीतात माझ्या
व्यर्थ तू गुंतून जावे
अन अशा या सांजवेळी
व्यर्थ मी व्याकूळ व्हावे

व्यर्थ माझे सूर हे अन
व्यर्थ सारया भावना या
गीत कंठातील माझ्या
वाहुनी जाइल वाया

व्यर्थ या शब्दांस माझ्या
ओढ नाही चांदण्यांची
व्यर्थ या माझ्या स्वरांना
साथ ओल्या पापण्यांची

व्यर्थ वारे वाहणारे
व्यर्थ हे आहेत तारे
तू जिथे नाहीस तेथे
व्यर्थ सारे व्यर्थ सारे

व्यर्थ या गीतांत वेड्या
वेचला मी जन्म सारा
व्यर्थ आतासांत्वनाला
कोरडा आला किनारा
व्यर्थ हा आक्रोश माझा
तू पुन्हा यावे म्हणुनी
जीवनाच्या पायथ्याशी
व्यर्थ गावे स्पंदनांनी

व्यर्थ या मातीत आता
प्रीत माझी पाझरावी
जीव हा माझा जळावा
अन तुला गीते स्मरावी?

व्यर्थ माझ्या इंद्रियांनी
शेवटी संन्यास घ्यावा
व्यर्थ सारया जीवनाला
अन निराळा अर्थ द्यावा.

शनिवार, ३१ ऑक्टोबर, २००९

शब्द

शब्द : सांगणारा
शब्द : थांबणारा-अहेतुक, सहेतुकही!
शब्द : प्रपातासारखा अस्खलित, अनावर
शब्द : घनगर्द कुंजासारखा चाहुल न देणारा
आतल्या एकांताची
शब्द : रथयात्रेत बेहोष घोंगावणारा
शब्द : उजळणारा लावताना सांजवात
तुळशीपाशी...
नवल एक : शब्दांची वाटणी इतकी विषम कशी
तुझ्या माझ्यात?
नवल दोन : तुझे-माझे मौन मात्र एकरूप,
आस्वादक
फुलानेच फुलाचा वास घ्यावा, तसे !

मंगळवार, २७ ऑक्टोबर, २००९

नशीब
जी माणस हवीशी वाटतात
ती कधीही भेटत नाहीत
जी माणस नकोशी वाटतात
त्यांचा सहवास संपत नाही
ज्यांच्याकडे जावेसे वाटते
त्यांच्याकडे जायला जमत नाही
ज्यांच्याकडे जावू नये असे वाटते
त्यांच्याकडे जावेच लगते
जेव्हा जीवन नकोसे वाटते
तेव्हा काळ संपत नाही
जेव्हा जीवनाचा खरा अर्थ
तेव्हा काळ संपलेला असतो
नशीब हे असच असत
त्याच्याशी जपून वागाव लागत
तिथे कोणाचच चालत नाही

शनिवार, २४ ऑक्टोबर, २००९

काही चारोळ्या

खुप काही सांगायच होत तुला
पण शब्दांनी साथ सोडून दिली
कधी वेळेच कारण पुढे आल
तर कधी तुझ्या अबोल्याने वेळ मारून नेली.................

तू नही तर नाही
तुझी आठवण तरी येवून जाते
पण तुला भेटण्याची ईच्छा
नेहमी सारखीच मनात राहून जाते...........

शनिवार, १२ सप्टेंबर, २००९

तुझ्याविना...............


जग माझे सुने सुने बघ! झाले तुझ्याविना

जीव रमवावा कसा मन कुठेही लागेना



दुःख, वेदनांचे घन बरसले माझ्यावर

आशा सागरी बुडाली, आला अश्रुनाही पुर

सख्या! जावू नको दूर मज पोहता येईना..............


क्षण क्षण आनंदाचा तुझ्याविना दुखी आहे

प्रेमजलाची सरिता दुःख सागरात वाहे

गंध नसताना तुझा आज वाराही वाहेना..........


तुझ्याविना जगी मला आज एकटेसे वाटे

दाहिदिशांचा कालोख माझ्या जीवनात दाटे

जगु कुणासाठी आता? तुझी साथ नसताना...................
लागे तुझीच चाहुल जिथे तिथे क्षणोक्षणी
साद घालता मी तुला भीने वारा पानोपानी
दिसे तुझीच प्रतिमा जिथे तिथे पाहताना .....................

मैत्रीचा अर्थ

मैत्रीत असते आईची माया

मैत्रीत असते वडिलांची छाया

मैत्रीत असतो बहिणीचा वाद

मैत्रीत असतो संगीताचा नाद

मैत्रीत येते झुलुक वार्याची

मैत्रीत असते साथ खर्याची

मैत्रीत सतो चंदनाचा सुगंध

जसा नाजुक रेशमाचा बंध

मैत्री म्हणजेसोनेरी पिंपलपान

मैत्री म्हणजे जीवनाती मखमली रान

मैत्रीत मिळतो शिक्षकांचा मार

पण यातूनच घडतो ना सुसंस्कार!

मैत्री म्हणजे संस्कारांची शिदोरी

जसे निरागस मूल आईच्या पदरी

मैत्रीत असतात वेगलेच तरंग

जणू नभातील इंद्रधनुचे सप्तरंग

मैत्रीत नसतो कोणताच स्वार्थ

मैत्रीने मैत्री जपणे हाच तर मैत्रीचा अर्थ

मैत्रीचा अर्थ

बुधवार, २९ जुलै, २००९

तुझ्या सवे जे जे क्षण जगले
आनंदाने सदैव हसले
रुसले, फुगले ,कधी हिरमुसले
तरीही तुझ्याच विश्वात रंगले

मंगळवार, २८ जुलै, २००९

चारोळ्या



माझ्या मनाच्या एकाकोपर्यात तुझच चित्र लपलय

ते माझ नाही माहीत आहे पण, मी जीवापाड जपलय.......
पूजा

गुरुवार, २३ जुलै, २००९

आई!

आई!

आई! आई या शब्दात सगळविश्व सामावालेल असत
तिच्या मायेच्या कुशीत पिलाने सार कही कमावालेल असत
आईच्या वत्सल्यादायी डोळ्यात
उज्जवल भविष्याच स्वप्न पहायच असत
तिच्याच आशिर्वादाने स्वप्नाना वास्तवात आणायच असत
आईच्या हृदय मंदिरात कायम पुजारी बनुन रहायच असत
तिच्या मूर्तिमंत चेहरयात परमेश्वर दर्शन करायच असत

काहीना नसते आई....
काहीना नसते आई पण .....,
वाईट वाटुन घ्यायच नसत
ही तर दैवाने दिलेली संधी आहे
कारण आईला फक्त अनुभवायच असत .