नशीब
जी माणस हवीशी वाटतात
ती कधीही भेटत नाहीत
जी माणस नकोशी वाटतात
त्यांचा सहवास संपत नाही
ज्यांच्याकडे जावेसे वाटते
त्यांच्याकडे जायला जमत नाही
ज्यांच्याकडे जावू नये असे वाटते
त्यांच्याकडे जावेच लगते
जेव्हा जीवन नकोसे वाटते
तेव्हा काळ संपत नाही
जेव्हा जीवनाचा खरा अर्थ
तेव्हा काळ संपलेला असतो
नशीब हे असच असत
त्याच्याशी जपून वागाव लागत
तिथे कोणाचच चालत नाही
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा