माझी ब्लॉग सूची

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०११

नावात काय आहे?






नावात काय आहे असे म्हणतो ना आपण
नावात काय आहे?

मग नावात काहीही नाही तर जातीत काय आहे?
भाषेत काय आहे आणि पंथात काय आहे?

कोण म्हणाले ही २१वी सदी आहे म्हणून?
प्रत्येकाला स्वतःच्या मतानुसार वागायचा हक्क आहे?
असे आहे का?
बघा तुम्ही स्वतःलाच विचारुन

नेत्याने पक्ष बदलला की लगेच
कार्यकर्ते पक्ष बदलतात
त्यानंतर मग आम्हालाही मागे मागे जावे लागते
इच्छा नसते त्या पक्षाचे मग व्हावे लागते
हीच का २१ वी सदी?

नेत्यांनाच स्वतःचे अस्तित्त्व नाही तर
ते आमचे भविष्य काय घडवणार?

मतांसाठी खेळ सारा हा
मतदार राजा आता तरी जागा हो
योग्य ते सरकार निवड
आणि मराठ्यांचे भविष्य घडव

जय महाराष्ट्र म्हणायला गर्व वाटू दे
मराठी माणूस म्हणून जगायला गर्व वाटू दे


जय महाराष्ट्र ............. ......... ....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा