माझी ब्लॉग सूची

मंगळवार, २७ सप्टेंबर, २०११

स्पंदन

स्पंदन

जगातील प्रत्येक घटक स्वतःचे अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतो. बुद्धीजीवी माणसात तर स्वतःचे अस्तित्व दाखवण्याची स्पर्धाच लागलेली असते. या स्पर्धेत अनेक जण भेटतात, भिडतात, काहीजण कोलमडून जातात तर काही अजिंक्य ठरतात. स्पंदन....! अस्तित्वाची निशाणी..... जिवंतपणाचे लक्षण.... स्पंदन.........! हृदयाची धकधक...... जाणीवेचा मार्ग.....!
स्पंदन प्रत्येक घटकात जाणवत असते. प्रेमात स्पंदन एकजीव होते... मैत्रीत कधी मदतीचा हात तर कधी त्यागाचे प्रतिक असते..... माणसांच्या गर्दीत हरवून जाते.... तर एकांतात उचमळून येते... वार्याच्या झुळुकीबरोबर साद घालते.. रानाच्या पात्यावर दवबिंदू होते... कधी पाखरांच्या भरारीवर स्वार होते... तर कधी इवल्याश्या खोप्यात हळूवात विसावते. निळ्याभोर आकाशात एकाकी तारा बनून असते स्पंदन... वळवाच्या मृदगंधातून दरवळून येते स्पंदन....! कविवर्य सुरेश भट एका कवितेत म्हणतात.

"पुन्हा माझ्या स्पंदनांची झाली फुले,
पुन्हा माझ्या अंतरात मत्त नभ झुले

झगमगे तारुण्याची पुन्हा दीपमाळ,
पुन्हा माझ्या प्राणावर चंद्रबिंब कले

आज माझा श्वास श्वास सुगंधकल्लोळ
आज माझा शब्द शब्द प्रकाशाचा लोळ

विसराळू आयुष्याला पुन्हा सापडली,
तुझ्या माझ्या आयुष्याची हरपली ओळ."
आयुष्य हि परमेश्वराची अमूल्य देणगी......! पण, जीवनाचा मार्ग अत्यंत खडतर, दगड गोटे, खाचखळगे आणि काट्याकुट्यानी व्यापलेला...! मात्र, अंतरीचा भाव निकोप आणि निरागस असेल तर जीवनातल्या काट्याकुट्याचे रुपांतर मखमली फुलात व्हायला वेळ लागत नाही. स्पंदनातून माणसाची सुरुवात झाली. भाव मात्र माणसाने निर्माण केले. स्पंदनात जर सौंदर्याचा भाव असेल तर जग स्वर्गाहून सुंदर बनेल... खरच, जीवन सुंदर आहे याचे अद्वैतम ज्ञान मिळेल....! जीवनातल्या प्रत्येक क्षणातून स्पंदन बाहेर पडत असतं... कधी सोज्वळ हर्षातून.... कधी विरहाच्या आसवांतून..... कधी नदीच्या प्रवाहातून.... तरंगातून.... कधी सागराच्या लाटेतून, गर्जनेतून.... कधी रुसलेल्या काळ्याकुट्ट ढगातून.... कधी रेशीमबंध गुलाबी क्षणातून.... स्पंदन डोकावत असतं.
कवी संदीप माळवी म्हणतात-
" हारला प्रत्येक माझा श्वास आहे अन तरीही जिंकण्याचा ध्यास आहे.
फक्त तू हातात घ्यावा हात माझा अंतरीची एवढीशी आस आहे "
आपण कितीही पिचत पिचत जगात असलो तरी, चैतन्याचे आनंदाचे वारे हातातून निसटून दिले नाहीत तर स्पंदनाच्या प्रत्येक ठोक्याबरोबर उल्हासित जीवनाचा उपभोग घेता येईल, शेवटी आपले जीवनच एक मोरपंखी अस्तित्व असते त्यामुळे इवल्याशा कुशीत ते जपायलाच ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा