आठ वाजले, नऊ वाजले, दहा वाजले. छे! अकरा बारासुद्धा वाजले, तु का गं आली नाहीस? तू रोज येणारी. तुझी ठरलेली वेळ. चोर पावलांनी येऊन हळूच डोळे झाकणारी तू. अद्यापि का बरं आली नाहीस? तू अशा रात्रीच्यावेळी मला एकटीला सोडून कां बरं गेलीस? तू ये. मला चैन पडणार नाही तुझ्याशिवाय. मी अंथरुण घातलं, पासोडी ठेवली. वाट पाहता पाहता कंटाळून पुस्तक वाचणं सुरू केलं. पण तुझा पत्ता नाहीं.
बरीच रात्र झाली काय करु आतां? भयाण काळोख चहूकडे पसरलायं. पुस्तक टाकलं, गादीवर पडले. पण छे! नाही गं चैन तुझ्याशिवाय. लवकर ये ना! मनाला किती समजावून सांगितलं किं- वाट पाहू नको, पण कसे होणार? तुझ्याविणा कसतरी होतयं. कंटाळून शेवटी जांभया येताहेत. अरेच्चा......! यायला लागलीस तु? तरीचं म्हटलं. जांभया कशा आल्या. दूतांना पुढे पाठवलं वाटतं! बरं! चला तूंहि आलीस. आत पुस्तक नको.दीवा नको. झोपलेलं बरं! उद्याच उद्या. झोप आली हं..!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा