जगत होते आनंदी जीवन
प्रेम कधी झाले कळलेच नाही
प्रेम मनापासून करत होते
नाते कधी जुळले कळलेच नाही
नात्यांचा पुर्णपणे स्विकार केला
बालपण केंव्हा संपले कळलेच नाही
कर्तव्याचा भार मनावर पडला
स्वतःच्या इच्छा कधी कळल्याच नाही
जुने नाते थोदे दुर गेले
अश्रु कधी आले कळलेच नाही
माहेरच्या आठवणी विसरुन थोडया
संसारात कधी रमले कळलेच नाही
रेवती किर्तनकार, परभणी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा