कविता कधी अशीच सुचत नाही.....
मनाच्या कोपर्यात कविता कधी अशीच सुचत नाहीकुठे तरी मनात न बोलता सांगणार असत खुप काही.....
मनात घुटुन बसतात व्यक्त होणारे असंख्य शब्दमन हतबल होउन निपुट पणे पाहत सगळ स्तब्ध.....
फेडन्याची इच्छा असुनही न फेडताच ठेवावी लागतात देणीअनेक दुख गिळत आपण डोळ्यातलेही थेंब गिलतो मनोमनी.....
जगण्याच नाटक कराव लागत क्षणोक्षणी मरतानाजिंकत आलेल स्वप्न पाहाव लागत कधी हरताना.....
उन्हाचे चटके झेलून अनेकांसाठी झाडाची सावली व्हाव लागतसार असह्य होउन सुद्धा डोळ्यातील थेंम्बाना निमूट प्याव लागत.....
अनेक विचार मांडल्यावर मग कागदावर येतात शब्द धाऊनविचारांच्या जंगलातला वणवा न पेटताच विजतो राहून.....
हे सार सोसल्यावर मग कुठे जन्मते कविता टीच भरटीच भर असली तरी अनेकांचे गहिवरून आणते मन खर.....
faar ch chan
उत्तर द्याहटवा